K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

दहा नैतिक मूल्ये

दहा नैतिक मूल्य

नैतिक मुल्ये:-
प्रस्तावना:
आदिम कालखंडापासून मानवी उत्क्रांतीवादाचा अभ्यास केला असता आपल्या निदर्शनास येईल की, आदिम काळात मानव मूलभूत गरजा भागवत जगत होता. या गरजा भागवत असताना त्याने त्याच्याकडे असलेल्या बुद्धीचा व कौशल्यांचा वापर करून निसर्गावर मात करत इतर प्राण्यांचा व नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून विकास साधून घेतला. कालांतराने याच मानवाने या सर्व गोष्टींचा वापर करून विकासाबरोबर संस्कृती, शिष्टाचार, शिक्षण, तत्त्वज्ञान, जीवनमूल्य सारख्या संकल्पना साकार करायला सुरुवात केली व त्यातूनच माणूस हा सुसंस्कृत बनला. यावेळी शिक्षण इतिहासात ज्ञान व प्रगती हा शिक्षणाचा प्रमुख पैलू असल्याचे दिसून येईल.



पृथ्वीवरील प्रत्येक साधन सामग्रीचा वापर करून आधुनिकतेची कास धरून चंद्र नव्हे तर मंगळापर्यंत जाऊन पोहोचला. मात्र इकडे माणूसच माणूसपण विसरून गेला व प्रगतीच्या मार्गामध्ये अनैतिकता, व्यभिचार, दुर्वर्तन व परिणामी विध्वंस यासारखे अडसर येताना दिसून यायला लागले. या जगामध्ये मानवाला मानव बनून जगणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे दिसून येऊ लागले.

हल्ली शिक्षणाचा अर्थ केवळ पाठ्यपुस्तक,अभ्यासक्रम, परीक्षा, निकाल, अव्वल नंबर असाच अभिप्रेत झाला आहे. या जगाला स्पर्धेचे जग म्हणून संबोधण्यात येते, मात्र या स्पर्धेच्या जगामध्ये ‘स्पर्धेची परीक्षा’ का ‘परीक्षेची स्पर्धा’ याचाच अर्थ स्पष्ट होत नाही. त्यामुळे केवळ स्पर्धा गुण व अव्वल क्रमांक म्हणजे शिक्षण न होता मानवतावाद याचा सर्वांगीण विकास करणे हे सर्वात मोठे आव्हान शिक्षण व्यवस्थेवर आहे. उदाहरण म्हणून द्यायचे झाले तर या स्पर्धा युक्त शिक्षणाच्या माध्यमातून एक मुलगा डॉक्टर झाला. तो डॉक्टर झाला खरा पण त्यामध्ये मूल्य व तत्त्वांची अभिरुची झालीच नाही. त्याने आपल्या ज्ञानाच्या साह्याने एक अगतिकच शोध लावला, एखाद्या पेशंटवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला भूल दिली जाते, म्हणजे त्याचे शरीर बेशुद्ध केले जाते. या भुलीचा वापर स्वतःवर करून नशा तो करू लागला व एक दिवस त्यातूनच त्याचा मृत्यू झाला. तात्पर्य - तत्व किंव्हा मुल्यांशिवाय व्यक्ती केवळ शरीराने वा पदवीनेच डॉक्टर राहील.


शिक्षण प्रक्रियेमध्ये आधुनिकता, विकास, प्रगतीचे व ज्ञानाचे धडे देण्यापेक्षा मानवतेचे, तत्वज्ञानाचे व मूल्यांचे धडे देणे गरजेचे वाटू लागले आहे. त्यातूनच मुल्यशिक्षणाची गरज शालेय अभ्यासक्रमामध्ये प्रत्ययाने जाणवू लागली. त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये दहा नैतिक मूल्यांची अभिरुची घडवून आणणे गरजेचे आहे.

नैतिक मूल्य म्हणजे काय?:-
व्यक्तींमध्ये ज्ञानाबरोबर शील, चारित्र्य, संस्कार याची रुजवणूक करणे याला नैतिक मूल्य अभिरुची असे आपण म्हणू शकतो.

ज्ञान आणि तत्व किंवा मूल्य या बाबतीत एक विसंगती आढळून येईल. ज्ञान मिळवता येते ते देता वा घेताही येते. मात्र मूल्य ही अंगीकारावीच लागतात व त्यांची रुजवणूक करणे अत्यंत गरजेचे असते. ज्ञान कोणत्याही वयात मिळवता येते मात्र वेळ निघून गेला असता मूल्यांचे पारायण करूनही काहीही उपयोग होनार नाही. या तत्त्वांची अभिरुची रुजवणूक करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षण विभागाला करावे लागणार आहे यामधूनच खऱ्या अर्थाने माणूस हा माणूस म्हणून जगेल……..


दहा नैतिक मूल्य

वक्तशीरपणा
नीटनेटकेपणा
श्रमप्रतिष्ठा
सौजन्यशीलता
सर्वधर्मसहिष्णुता
राष्ट्रभक्ती
संवेदनशीलता
वैज्ञानिक दृष्टिकोन
राष्ट्रीय एकात्मता
स्त्री-पुरुष समानता

No comments:

Post a Comment