K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 12 July 2019

कोणत्याही सॉफ्टवेअर शिवाय पेन ड्राईव्ह ला पासवर्ड प्रोटेक्ट करा....


मित्रांनो, आज प्रत्येकाच्या खिशामध्ये एखादा पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड असतेच बर्याचदा आपल्या पेनड्राईव्ह मध्ये अतिशय महत्वाचा डेटा  असतो किंवा आपला खाजगी डेटा असतो अनेकदा आपला पेन ड्राईव्ह आपल्याशिवाय दुसरा कोणी देखील वापरत असतो नाही तर कधी आपला पेन ड्राईव्ह हरवला आणि तो कोणाला सापडला तर आपल्या डेटा  चा गैरवापर होऊ शकतो आणि असे होण्यापासून कसे रोखावे तेच आज सांगणार आहे म्हणूनच हि पोस्ट आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची अशी आहे.

  तसे पाहायला गेल तर इंटरनेट वर पेन ड्राईव्ह ला पासवर्ड प्रोटेक्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे सोफ्टवेअर मिळतात परंतु ते डाउनलोड करण्यापसून ते पेन ड्राईव्ह पासवर्ड प्रोटेक्ट करण्यापर्यंत अनेक क्लिष्ट प्रक्रिया असू शकतात म्हणूनच आज आपण कोणतेही सोफ्टवेअर न वापरता आपला पेन ड्राइव्ह प्रोटेक्टेड करणार आहोत.
 चला तर मग सुरुवात करू सुरवातीला तुम्ही तुमचा पेन ड्राईव्ह तुमच्या कॉम्पुटर ला जोडा आणि माय कॉम्पुटर मध्ये जा


आता तुमचा पेन ड्राईव्ह जेथे दिसत आहे त्याच्यावर राईट क्लिक करा तेव्हा वरील चित्रात दाखविल्या प्रमाणे तुम्हाला काही ओप्शन्स दिसतील त्यामधील Turn on BitLocker... हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा, आता तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारला जाईल या ठिकाणी तुम्हाला जो हवा तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाईप करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा.

आता तुम्ही नेक्स्ट वर क्लिक केल्यावर तुम्हाला समोर पुन्हा दोन पर्याय दिसतील त्यातला पहिला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे 
                       www.espjoshi.blogspot.in
याचा उपयोग असा कि समजा तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला आहे तेव्हा तुमच्या कॉम्पुटर मधेच त्यासाठी पर्यायी पासवर्ड म्हणून एक फाईल सेव्ह होईल जेव्हा कधी तुम्ही तुमचा पासवर्ड विसराल तेव्हा तुम्हाला या फाईल चा उपयोग तुमचा पेन ड्राईव्ह ओपन करण्यासाठी होईल.
 दुसरा पर्याय म्हणजे तीच फाईल तुम्हाला प्रिंट काढून हवी असल्यास तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेऊ शकता यातील आपण पहिला पर्याय म्हणजे कॉम्पुटर मधेच रिकव्हरी फाईल सेव्ह करण्यास घेऊ हा पर्याय निवडून जेव्हा तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुमची फाईल कोठे सेव्ह करायची आहे हे विचारले जाईल.

 तुम्ही हव्या त्या जागी फाईल सेव्ह करा जसे तुम्ही पुढे जाल तसे तुम्हाला
Are you ready to encrypt this drive ?असे विचारले जाइल म्हणजे तुम्ही कन्फर्म आहात का हे तुम्हाला विचारले जाइल  मग तुम्हाला  Start Encrypting  या बटनावर क्लिक करायचे आहे. या नंतर तुम्हाला काही न करता फक्त वाट पहायची आहे कारण या प्रक्रीये साठी साधारण १० ते १५ मिनिटाचा कालावधी लागू शकतो काळजी न करता तुम्ही थोडा वेळ थांबलात तर तुमची प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला तसा मेसेज समोर दिसेल मग काय झाले काम तुमचा पेन ड्राईव्ह एकदा काढून पुन्हा जोडून पहा तुम्हाला पासवर्ड विचारला जाइल जोपर्यंत तुम्ही पासवर्ड टाईप करणार नाही तो पर्यंत तुमचा असलेला डेटा पाहू शकणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुमची Encrypting ची प्रक्रिया चालू आहे तो पर्यंत तुम्ही तुमचा पेन ड्राईव्ह डिस्कनेक्ट करू नका, अन्यथा तुमचा असलेला डेटा करप्ट होण्याचा धोका आहे.
विडिओ च्या सहाय्याने ही आपण pendrive Lock
करु शकता->>>


how to Password Protect a USB Flash Drive and Secure your Files
Share on Facebook Twitter
Vintaytime Staff     Vintaytime Staff
1 year ago
How to Password Protect a USB Flash Drive and Secure your Files
Report Media

Role of a USB stick in your daily life is little important as your smartphone and the files you carry with the USB is more important. If you lost your USB mistakenly at a place or anywhere, you didn’t care about that cheap USB, because it comes at very cheap price, but the files stored in the USB drive is everything you will care. Mostly, people keep important stuff in USB like Documents, Projects, Images etc, to easily use data on any computer or device. But, what if your USB is gone to bad hands?. Password protection is best for those who carry important files in USB and they didn’t want to share their files with others.

Once you password protect your USB, you’re not able to boot Windows with that USB. In this case case, you may carry multiple USBs and keep your important data on the password protected USB flash drive.
Without Software: BitLocker Drive Encryption

In Windows vista/7/8 and later, Microsoft serve a security tool for Windows users known as BitLocker Drive Encryption to protect any drive, including external, internal, flash drive with a password and it makes all of your files in the drive more secure. Once you turn ON BitLocker for a USB drive, you don’t need to install any third party tool on other windows computer to explore files. Just connect your bitlocker encrypted flash drive to windows computer and it will automatically prompt and ask to user to input their password.

Follow the steps below enable BitLocker Drive Encryption for USB flash drive:

    Connect the USB flash drive to PC.
    Right click the flash drive > Select Turn on BitLocker (If you don’t see this option, simply go to Control panel > BitLocker Drive Encryption > Turn on Encryption for your external flash drive).
    Check the box: Use the password to unlock this drive, and create a new password.
    Go to the next step and you’ll get a recovery key that helps you later to recover your forgotten password > Save it.
    Go next and click Start encrypting.drive-encryption
    Wait for some time, until it completes. Encryption may takes time according to your USB size & performance.
    After completed, your flash drive look like below snapshot on other computers (To test, simply plug-in flash drive to another USB socket).protected-drive
    Open disk > input password > Enjoy!.

To Decrypt (remove password)

Follow the steps below disable BitLocker Drive Encryption for USB flash drive:

    Unlock the drive using the password
    Right click on it > Select “Manage BitLocker” (or go to Control panel > BitLocker Drive Encryption)
    Turn off BitLocker for your drive
    Decryption may takes time according to your USB data, size & performance

Best USB password protection software

To protect a USB flash drive with a password with the help of a software, so just go for my best choices below.
Rohos Mini Drive
http://www.rohos.com/products/rohos-mini-drive/
rating-5.0

Rohos makes a hidden password protected partition on your USB and send all of your files in them. The drive letter will automatically generate and visible on your screen as you create a disk. When the disk creation completed, you can see the flash drive contain a file name Rohos mini portable, which allows you to open your protected files by entering a password on any computer even Rohos not installed on the computer without admin rights.
Features

    Open encrypted partition on any PC without admin rights.
    File virtualization.
    Protect password leak from many attacks (keylogger, temp files etc.).

USB Flash Security

rating-4.5

Flash security is a Light Weight, easy to use USB password protection tool lets you lock your pen drive with in a minute. USB drive is protected with AES encryption algorithm and your data will automatically encrypt even transfer was ongoing from computer to USB. After unlocking the flash drive on the computer, all of your data automatically decrypt and once you unplug the USB, it will automatically encrypt. The only reason why i give it 4.5 stars because it only eat little capacity of your drive when you install the tool in on your USB.
Features

    Simple, light and easy-to-use.
    Auto lock on unplug.
    AES encryption.

 USB Secure
http://www.newsoftwares.net/usb-secure/
rating-5.0

Not just a USB drive, you can protect any external drive with USB secure. It is an award winning tool, but not free, you can use it free until the trial ends. As you apply security using this software to your drive, you didn’t need to install the tool again on different computer, you just plug and play. You can also files from your drive and only protect specific files not the complete USB drive.

    Support all earlier versions of Windows.
    Multiple security layer.
    Lock specific files and folders.

USB flash security: Tutorial

All above listed software are best, but for this tutorial I’m using USB flash security. Follow the steps below to password protect a USB using USB flash security tool:

usb-flash-security-password

    Download & install USB flash security.
    Plugin in USB and first backup all of your data to different location.
    Launch USB flash security.
    Click install > Create a new password & confirm.
    Plug-out and then In.
    Enter your password (see the above snapshot) & enjoy.
    To remove the password, again open the tool and select Uninstall from operation menu.

FAQ
Can I access BitLocker protected drive on OSX or Linux?

If you want an official answer then its No, you can’t because BitLocker is a tool comes with Microsoft windows and on different platform you can only access drive through a trick. On the web, I found a tool called Dislocker that lets read BitLocker encrypted drive on OSX & Linux systems.
Is there is any risk for my USB data & Performance?

If you feel that your USB data may lost/corrupt/damage while using password protection, so please first backup your data and then give a try. The tools I listed above are all working well and if any data lost exist, then these tools will alert you. There is no impact on performance.
Same software must be installed on computer to unlock drive?

No, the software I listed above will not require on the different computer to access your files.

http://vintaytime.com/usb-password-protection/

Thursday 20 June 2019

*महत्वाचे महत्वाचे*

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶 *सर्व पालकांना नम्र विनंती आता शाळा सुरू होताहेत तर आपल्या मुलांना शाळेत विद्यार्थी म्हणूनच पाठवावे .काही मुद्दे खालील प्रमाणे*   
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰     
*१)त्याच्या केसांची ठेवण त्याकडे लक्ष द्यावे .तो मनुष्य प्राणीच वाटावा* .
*२)पायातील बूट दीडशे रुपयांपेक्षा जास्त किमतीचा नसावा* .
*३)ड्रेस निवडताना विनाकारण जास्त पैसा घालू नका* 
*४)शालेय गणवेशा व्यतिरिक्त इतर ड्रेसवर जास्त खर्च करू नये*.
*५)नोटबुक्स आणि पुस्तके योग्य तेवढीच खरेदी करावीत* .
*६)दादा, भाऊ ,पाटील, पाटलांचा अमुक ,पाटलाचा टमुक इत्यादी  सर्व उपाध्या घरीच ठेवून यायला सांगा* .
*७)अँड्रॉइड मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा* .
*८)मुलांचे चुकीचे लाड किंवा हट्ट पुरवू नका* .
*९)तुमची क्षमता असेल तरी सुद्धा त्याला काही गोष्टींची उणीव जाणवून द्या* .
*१*०)पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या* .
*११)शाळेत पाठवताना मुलाकडे एकही रुपया ठेवू नका .आवश्यकता वाटल्यास शिक्षक तसा निरोप पाठवतील* .
*१२)आपल्या मुलाला शिक्षित बनवण्या पेक्षा  सुशिक्षित बनविण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा .दिवसातून किमान एक तास तरी आपल्या मुलांसाठी आवर्जून काढा* .
*१३)मुलांमध्ये  देशभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करा* .
*१४)आपली मुले विकृत विचारसरणीच्या सहवासात राहात असतील तर त्यांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा .तुमची मुलं जास्ती जास्त वेळ तुमच्या सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा* .
*१५)आधुनिक जगामध्ये राहत असतांना वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच कौटुंबिक आाणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्यासाठी मुलांना तयार करा .कुटुंबातील वाडवडिलांचा सर्वांनी आदराने सांभाळ केल्यास मुलांना तेच संस्कार मिळतात* .
*१६)महिन्यातून किमान दोन वेळा आपल्या मुलाच्या शिक्षकांना जरूर भेट दया*.
*१७)तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षक मुलांमध्ये परिवर्तन आणू शकत नाहीत याची नोंद घ्या* .
*१८)मुलांना एकदा शाळेत पाठवलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असे समजू नका*.
*१९)आपल्या मुलाचा शिक्षक मुलांना योग्य शिक्षण आणि संस्कार देतो किंवा नाही यासाठी सतर्क राहा नसल्यास संबंधित बाब शिक्षकांच्या लक्षात आणून द्या*.
*२०)शिक्षक देव नसून त्यांनाही मार्गदर्शनाची गरज आहेच* .
*२१)शिक्षकांचा योग्य मानसन्मान आपल्या पाल्यांना करायला सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या*
*२२) मुलं चुकली असतील तर त्यांना समजावून सांगा*
*२३) मुलाच्या बुध्दीमत्ते नुसार प्रगती होईल अवास्तव अपेक्षा ठेवू नका*
24) *इतर मुलांसोबत कधीच तुलना करू नका*
25) *किमान एक वेळच जेवण सोबत करा*
*26) तुमच्या चर्चे मध्ये त्यांना सहभागी करून घ्या*
*27) त्यांच्या मतांचा आदर करा*
*28) तुमच्या कामाचा ताण त्यांच्यावर काढू नका*
*29) मुलं तुमच्या सोबत त्यांच्या समस्या बोलतील अस वातावरण तयार करा*
*30) नेहमी स्मितहास्य करून बोलत रहा*
*31) शाळेला सतत सहकार्य करा*
🙏🙏🙏🙏

Thursday 11 April 2019

आज महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती



*जोतीराव गोविंदराव फुले*

*वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक*

*जन्मदिन - एप्रिल ११, इ.स. १८२७*

महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. –

“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।  ”

जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’
मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याच ा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

Sunday 24 March 2019

🗜🅿🗜🅿🗜🅿🗜🅿🗜🅿🗜

*विविध प्रवेशासाठी अत्यंत महत्वपूर्ण*



*मेडीकल* प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे👈🏿

1) *नीट* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) *नीटप्रवेश* पत्र 
3) *नीट मार्क* लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
11) आधार कार्ड
12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2019 पर्यत लागू)

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.

👉🏿 *इंजिनीअरिंग* प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे👈🏿
1) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) MHT-CET* पत्र 
3) MHT-CET* मार्क  लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) आधार कार्ड
11) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
12) राष्ट्रीय बँकेतील खाते                                         13) फोटो 
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2019 पर्यत लागू)

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्याव


*वैद्यकीय क्षेत्र* 


*शिक्षण - एमबीबीएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि सीईटी प्रवेश परीक्षा 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका 

*शिक्षण - बीएएमएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका 

*शिक्षण - बीएचएमएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - एमडी 

*शिक्षण - बीयूएमएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 

*शिक्षण - बीडीएस* 

कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - एमडीएस 

*शिक्षण - बीएससी इन नर्सिंग* 

कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र 
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 

*शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच* 

कालावधी - पाच वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र 
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय 
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 

*शिक्षण - डिफार्म* 

कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश 
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय 
पुढील उच्च शिक्षण - बीफार्म 

*शिक्षण - बीफार्म* 

कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म 

संरक्षण दलांत प्रवेशासाठी 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात. 
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात. 
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

*अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल*

*शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा* 
कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश 
संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार 
पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश 
*शिक्षण - बीई* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस 
*शिक्षण - बीटेक* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई 
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस 
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी - 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी 
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण 
कालावधी - दोन वर्षे 
पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण 

 *कॉम्प्युटरमधील कोर्सेस* 


डीओईएसीसी "ओ' लेव्हल 

कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ 
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी 
कालावधी - दोन वर्षे 
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी 
कालावधी - सहा महिने 
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन 
कालावधी - तीन महिने 
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग 
कालावधी - दहा महिने 
इग्नू युनिव्हर्सिटी 
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग 
कालावधी - एक वर्ष 

*शिक्षण - बारावी*


*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन* 
कालावधी - एक वर्ष 
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट 
कालावधी - दोन महिने 
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स 
कालावधी - एक वर्ष 
(फक्त मुलींसाठी) 
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग 
कालावधी - दोन वर्षे 
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट 
कालावधी - एक वर्ष 
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन 
कालावधी - एक वर्ष 
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट 
कालावधी - एक वर्ष 
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर 
कालावधी - एक वर्ष 

 *रोजगाराभिमुख कोर्सेस*


*शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी* 
कालावधी - तीन वर्षे 
पात्रता - बारावी (70 टक्के) 
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड 
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी 
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स 
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर 
*शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता - दहावी आणि बारावी पास 
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर 
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग 
फाउंडेशन (एनटीटीएफ) 
सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस 
कालावधी - एक वर्ष 
फॅशन टेक्‍नॉलॉजी 
कालावधी - एक वर्ष 
मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस 
कालावधी - तीन वर्षे 

*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*


*टूरिस्ट गाइड* 
कालावधी - सहा महिने 
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस 
कालावधी - दीड वर्ष 
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग 
कालावधी - तीन महिने 
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन 
सिस्टम (एअर टिकेटिंग) 
कालावधी - एक महिना 
अप्रेन्टाईसशिप 
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे 
*शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी* 
डिजिटल फोटोग्राफी 
कालावधी - एक वर्ष 
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग 
कालावधी - एक ते तीन वर्षे 
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी 
कालावधी - एक ते तीन वर्षे 

*बांधकाम व्यवसाय*


*शिक्षण - बीआर्च* 
कालावधी - पाच वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक  
*पारंपरिक कोर्सेस*

*शिक्षण - बीएससी* 
कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट 
संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी 

*शिक्षण - बीएससी(ऍग्रो)* 

कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र 
संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय 
पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन 

*शिक्षण - बीए* 

कालावधी - तीन वर्षे 
संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 
पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी 

*शिक्षण - बीकॉम* 

कालावधी - तीन वर्षे 
संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी 

*शिक्षण - बीएसएल* 

कालावधी - पाच वर्षे 
संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा 
पुढील उच्च शिक्षण - एलएलएम 

*शिक्षण - डीएड* 

कालावधी - दोन वर्षे 
प्रवेश - सीईटी आवश्‍यक 
संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक 
पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड 

*शिक्षण - बीबीए,* बीसीए,बीबीएम 

कालावधी - तीन वर्षे 
प्रवेश - सीईटी 
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए 

*फॉरेन लॅंग्वेज* 

(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, 
जॅपनीज, कोरियन) 
कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर 
कोर्सेसवर आधारित

 *फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.......*


अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. 
पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा. 
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी. उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा. 
अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या. 
अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा. 
इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा. 
काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा. 
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा. 
--------------- 
*काही महत्त्वाची संकेतस्थळे*

1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन. 
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी) 
www.dte.org.in 
2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी) 
www.dmer.org
3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी) 
www.dvet.gov.in
4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ 
www.unipune.ac.in
5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई 
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी) 
www.iitb.ac.in 
6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण 
www.aipmt.nic.in 
7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी) 
www.upsc.gov.in
(लष्करात अधिकारी म्हणून जाण्यासाठी बारावीनंतर "यूपीएससी‘ची एकमेव परीक्षा)

संकलित🙏

Saturday 23 March 2019

पहिला जागतिक चिमणी दिवस - २० मार्च २०१० रोजी पाळला गेला.




​🔹२२ मार्च : जागतिक जल दिन




           पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे !

▪️मूळ संकल्पना व सुरुवात

संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदा.२०१५ ची संकल्पना होती पाणी व शाश्वत विकास- कारण पाण्याच्या अविचारी वापराने खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल.

▪️अधिक माहिती

तहान लागल्यावर विहीर खणू लागल्याने पश्न सुटत नाही. त्यासाठी या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले पाहिजे-

― पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.
― पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.
― जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे.
― पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे.

▪️साधी तरीही अत्यंत महत्त्वाची कृती

स्वत: ला खरोखरी किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार केला तरी खूप काही साधेल!


चला जागतिक जल दिन साजरा करू या
       एखाद्या महत्वाच्या प्रश्‍नावर आपले लक्ष केंद्रीत करण्यासाठी, आपण त्या प्रश्‍नाचे महत्व जनमानसावर बिंबवण्यासाठी एखादा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून पाळतो. पाणी प्रश्‍न दिवसेंदिवस आक्राळ विक्राळ रूप धारण करीत आहे. त्यामुळे सामान्य माणसाला पाण्याचे महत्व पटावे म्हणून आपण गेल्या काही वर्षांपासून जागतिक जल दिन साजरा करीत असतो. त्या निमित्ताने पाणी प्रश्‍नावर समाजात उद्बोधक चर्चा व्हावी, पाणी प्रश्‍नाचे खरे रूप सामान्य माणसाला कळावे, जनतेनी तो प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने काही संकल्प करावेत या दृष्टीने दर वर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून पाळला जातो.

       हा जागतिक दिन साजरा करणे सुरू करण्याचा मान एका भारतीयाला जातो हे आपल्याला माहित आहे काय ? जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ, स्टॉकहोम जल पुरस्काराचे विजेते डॉ. माधवराव चितळे यांनी हा प्रश्‍न सर्वप्रथम जागतिक मंचावर मांडला. त्यावर भरपूर चर्चा होवून २२ मार्च हा दिवस निवडण्यात आला. सुरूवातील हा दिवस निवडण्याबद्दल जल तज्ज्ञात मतभेद होते. काही जण २२ मार्च बद्दल तर काही जण २२ सप्टेंबर बद्दल आग्रही होते. विषुववृत्ताने पृथ्वीचे दोन भाग पडतात. त्याचे वरचा एक भाग तर त्याचे खालील एक भाग. वरच्या भागातील देशांना २२ मार्च ही तारीख पसंत होती तर खालच्या भागातील देश २२ सप्टेंबर बद्दल आग्रही होते. खालच्या भागातील देशांपेक्षा वरच्या भागात जास्त देश आहेत हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर २२ मार्च तारीख निश्‍चित झाली हे सांगायला नको.

२२ मार्च ह्या दिवसाचे असे काय वैशिष्ट्य आहे की हा दिवस निवडला जावा ? दरवर्षी पावसाळा सुरू होण्यासाठी २२ मार्च पासून वातावरण बदल व्हावयास सुरूवात होते. त्यामुळे तात्विक दृष्ट्या पावसाळ्याची सुरूवात होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरतो हा तर्क वापरून हा दिवस निवडण्यात आला.

पाण्याशी निगडीत खरे प्रश्‍न कोणते ?

एखादी गोष्ट अति परिचित असली तर त्या गोष्टीबद्दल जास्त अज्ञान असते. पाण्याबाबत नेमकी हीच परिस्थिती आहे. याचा वापर करावयाची आपल्याला इतकी सवय लागून गेली आहे की त्याच्याशी निगडीत प्रश्‍न सतत दुर्लक्षिले जातात. पाण्याशी संबंधित प्रश्‍न नेमके कोणते आहेत त्यांची आपण यादी करू या.

१. पाण्याकडे पहाण्याची मानसिकता कशी बदलता येईल ?
२. पावसाच्या पध्दतीत होणार्‍या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल ?
३. भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल ?
४. नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल ?
५. तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल ?
६. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल ?
७. पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल ?
८. पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल ?
९. पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल ?
१०. पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल ?

मानसिकतेत बदल :

पूर्वीचे काळी लोकसंख्या खूप कमी होती. त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता जास्त होती. आता लोकसंख्या वाढीमुळे दरडोई उपलब्धता घसरली आहे. पण माणसाने पाण्याच्या वापरात मात्र काहीच बदल केले नाहीत. या उलट पाणी वापराचे नवनवीन मार्ग मात्र तो शोधित असतो. त्यामुळे पाणी प्रश्‍नाची तीव्रता वाढतच चालली आहे. ती थांबवायची असेल तर आपण आपली मानसिकता बदलून पाणी बचतीचे नवनवीन मार्ग शोधून काढावयास हवेत.

पावसाचे पध्दतीत बदल :

हवामानात होत चाललेल्या बदलामुळे पावसाच्या पध्दतीत झपाट्याने बदल होत आहेत. पावसातील नियमितपणा कमी होवून तो बेभरवशाचा होत आहे. पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. त्या बरोबर पावसाचा वेगही वाढत चालला आहे. वेगाने पडणारा पाऊस वेगाने वाहून जातो व आपले भांडे मात्र रिकामेच राहते. त्यामुळे पावसातील बदलांची नोंद घेवून आपल्याला त्याचा संग्रह कसा करता येईल याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.

भूजलाची घसरती पातळी :

पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी आपण भूजलाचा उपसा भरमसाठ वाढविला आहे. कोणत्याही प्रकारचे जल पुनर्भरण न करता निव्वळ उपसा वाढविल्यामुळे भूजल पातळी वेगाने घसरत आहे. भूजल साठे खरे पाहिल्यास राखीव स्वरूपाचे साठे आहेत. ते हात राखूनच वापरले जावेत. पण आपण मात्र आपल्या ऐहिक सुखासाठी वेगाने उपसा केल्यामुळे आज भूजलावर संकट आले आहे. हे असेच चालू राहिले तर निसर्ग आपल्याला कधीच माफ करणार नाही. कृत्रिम पध्दतीने जलसाठे कसे वाढविता येतील याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे.

नद्यांचे बारमाहीकरण :

वेगाने नद्यांचे पाणी वाहून जात असल्यामुळे पावसाळा संपताच नद्या कोरड्या पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नद्या पूर्वीसारख्या बारमाही कशा वाहू शकतील याचा विचार करावा लागणार आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात या बाबत यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. त्या प्रयोगांचे यशापयश तपासून तशी योजना देशभर राबविता येणार नाही काय याचा विचार गंभीरपणे केला जावा.

तलावांचे पुनरूज्जीवन :

ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि सिंचन या साठी तलावांचे पुनरूज्जीवन अत्यंत निकडीचे आहे. पूर्वी भारत हा तलावांचा देश म्हणून प्रसिध्द होता. आज तलावांवरील अतिक्रमाणांमुळे कित्येक तलाव बुजवण्यात आले. एवढेच नव्हे तर वाढत्या नागरी वस्तींची गरज भागविण्यासाठी तलावांचे आकार घटत आहेत. यामुळे ग्रामीण पाणी प्रश्‍नाने गंभीर रूप धारण केले आहे. यासाठी सरोवर संवर्धिनीसारखी चळवळ उभारावी लागणार आहे.

पाण्याचा पुनर्वापर :

लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे तेच ते पाणी पुन्ह: पुन्हा वापरावे लागणार आहे. आज तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे जल शुध्दीकरणाचे नवनवीन मार्ग सापडत आहेत. या मार्गांचा वापर करून पाण्याचा पुरवठा वाढविणे शक्य झाले आहे. सिंगापूर सारख्या देशात या मार्गाचा फार झपाट्याने वापर सुरू झाला आहे. अरब देश समुद्राचे पाणी शुध्द करून पिण्यासाठी सुध्दा वापरत आहेत. आज जरी नाही तरी उद्या आपल्याला सुध्दा याच मार्गाने जावे लागणार आहे.

पाण्याचे वाढते प्रदूषण :

पाण्याचा सर्वात महत्वाचा दुर्गूण म्हणजे ते कोणाशीही तात्काळ मैत्री करते. प्रदूषकांचा पाण्याशी संबंध आल्यास ते अगदी सहजपणे त्याच्या विळख्यात सापडते व चांगले शुध्द पाणी प्रदूषित होवून जाते. माणसाला होणार्‍या विकारांपैकी ९० प्रतिशत विकार प्रदूषित पाण्यामुळे होतात असे वैद्यक शास्त्र म्हणते. जिवाणू आणि विषाणू पाण्याच्या संपर्कात आले तर पाणी प्रदूषित होते. सध्या यामुळे नद्यांतील, तलावांतील एवढेच नव्हे तर भूगर्भातील पाणी सुध्दा प्रदूषित झाले आहे. यावर ताबडतोब उपचार न झाल्यास सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

पाण्याचा उत्पादक कारणासाठी वापर :

आज जगात मोअर क्रॉप पर ड्रॉप ऑफ वॉटर चे नारे लावले जात आहेत. या मानाने आपण फारच मागासलेले आहोत. कारण पाण्याचा उत्पादकतेने वापर करण्यात आपण फारच मागे पडलो आहोत. आपल्याला देशात शेतीसाठी जी सिंचम व्यवस्था वापरली जाते तिला प्रवाही पध्दती म्हणतात. या पध्दतीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुर्वापर होतो व पाण्यासारखे दुर्मिळ संसाधन आपण वाया घालवितो. देशाची प्रगती करावयाची असेल तर पाणी अधिक उत्पादक पध्दतीने वापरावे लागेल.

पाण्याचे वितरण असमाधानकारक :

पाण्याच्या वापरात आज आपल्या देशात झुंडशाही आढळते. बळी तो कानपिळी याचा प्रत्यय आपल्याला या क्षेत्रात येतो. आपल्या देशात काही लोक अति खाऊन मरतात तर काही खायला न मिळाल्यामुळे मरतात. तीच परिस्थिती पाण्याचे बाबतीत आढळून येते. काही जमिनी अति सिंचनामुळे नापिक व्हावयास लागल्या आहेत तर काही पाणी न मिळाल्यामुळे नापिक आहेत. पाणी वितरण संस्था स्थापून त्यांचे हाती हा कारभार सोपवून आपल्याला पाण्याचे समान वितरण साधावायाचे आहे.

पाण्याचे सरकारीकरण धोक्याचे :

जी गोष्ट नीट सांभाळू शकतो तीच आपल्या हातात ठेवावी हे शहाणपण आपले सरकार कधी शिकणार नकळे. आज संपूर्ण पाणी प्रश्‍न सरकारमय झाला आहे. सरकारने मोठी धरणे बांधून ठेवली पण त्याची योग्य वितरण व्यवस्था न उभारल्यामुळे त्या पाण्याचा योग्य वापरच होत नाही. नागरी पाण्याचे वितरणही समाधानकारक नाही. जल वितरणात लोकांचा सहभाग नाही व त्यामुळे पाणी प्रश्‍न सरकार निर्मित तर नाहीना असे वाटावयास लागले आहे. जागतिक बँक आपल्याला पाणी व्यवस्था सुधारा असे वारंवार सांगत आहे. पण या क्षेत्रात केली जाणारी प्रगती अत्यंत धीम्या गतीने चालू आहे.
       या सर्व प्रश्‍नांवर जलजागरण होणे आवश्यक आहे. जलदिनाच्या निमित्ताने यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. लोकांना प्रश्‍न समजला तरच त्याची उत्तरे शोधली जावू शकतील. म्हणून आपण सर्वांनी मिळून जागतिक जल दिन साजरा करू या व या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकू या.


जागतिक जल दिवस जगभरात 22 मार्चला साजरा करण्यात येतो. युनायटेड नेशन वॉटर (United Nations Water) या संस्थेद्वारे या  दिवसाचे आयोजन केले जातं. पृथ्वीवर जमिनीखाली पाण्याचे अनेक नैसर्गिक स्त्रोत असतात. ज्यामधून नदी, विहीर, झरे, तलावांना पाणी मिळत असतं. मात्र प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे आज हे नैसर्गिक स्त्रोत लुप्त होत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर पाण्याचा  दुष्काळ पडण्याची शक्यता दाट आहे. पाण्याच्या दुष्काळामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पुढील पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आताच याबाबत योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. यासाठी जागतिक जल दिवसानिमित्त जगभरात स्वच्छ आणि ताज्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी जागरुकता निर्माण केली जायला हवी. खरंतर यासाठी जागतिक जल दिवसाचे (International water day) आयोजन करावं लागणं हे माणसाचं खूप मोठं दुर्देव आहे. कारण निसर्गाने माणसाला बहाल केलेली जलसंपत्ती माणसाने स्वतःच्या हातानेच वाया घालवलेली आहे. ज्यामुळे पाणी वाचवा जीवन जगवा या घोषवाक्याचा प्रचार आणि प्रसार करणं आज अत्यंत गरजेचं झालं आहे. म्हणूनच यंदाच्या जागतिक जल दिवसानिमित्त या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही पाणी वाचवा घोषवाक्य नक्कीच उपयुक्त आहेत.

जागतिक जलदिनानिमित्त पाणी वाचवा घोषवाक्य - Save Water Slogans In Marathi

१. पाणी जीवन आहे त्याची काळजी घ्या

२. पाणी नाही द्रव्य ते आहे अमृततुल्य 

३. दुष्काळाची नको असेल आपत्ती, तर वेळीच जपा जलसंपत्ती

४. थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा

५. ठिंबक आणि तुषार सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात मिळेल उत्प्नन्न भारी

६. जीवन हवं असेल सुंदर तर वेळीच करा काटकसर

७. पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यात तुम्हाला जे जे हवं ते मिळवा

८. पाण्याचे संवर्धन करा आणि मुलांच्या भविष्य सुरक्षित करा

९. शुद्ध पाण्याचे नवे तंत्र,सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र 

१०. स्वच्छ पाणी, सुंदर परिसर, तुमचे जीवन होईल सुखकर

११. पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू 

१२. सांडपाण्याची करू या विल्हेवाट, गावात होईल आरोग्याची पहाट

१३. पाणी वाचवण्याची धरू या कास, सर्वांचा होईल नक्कीच विकास

१४. पाणी सिंचन क्षेत्र वाचवूया नवीन पिढीला शिकवण देऊ या

१५. बचत पाण्याची गरज काळाची 

१६. पाणी बचत करेल जीवन सुसंगत 

१७. पाण्याच्या स्वच्छतेविषयी दक्षता घेऊ, सर्व रोगराईला दूर ठेवू

१८. पाण्याचे पुर्नभरण, जीवनाचे संवर्धन

१९. थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन, पाण्याने वाचेल सर्वांचे जीवन

२०. पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा

२१. वाचवाल पाणी आणि राबवाल जलनीती तर पळून जाईल दुष्काळाची भीती

२२. पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न

२३. पाण्याचे संरक्षण वसुधंरेचे करा रक्षण

२४. पाणी म्हणजे पृथ्वीचं स्पंदन, जीवसृष्टीसाठी आहे जीवन

२५. पाणी वापरा जपून म्हणजे भविष्य राहील टिकून

२६. स्वच्छ पाणी घरोघरी, आरोग्याची खरी हमी 

२७. पाणी म्हणजे जीवनाचे सार, याचा तुम्ही  करा विचार

२८. पाणी वाचवा जीवन वाचवा

२९. पाण्याविना जीवन बेजार, जीवसृष्टीला त्याचाच आधार

३०. पिण्यासाठी शुद्ध पाणी, नाही होणार आरोग्याची हानी



३०. पिण्यासाठी शुद्ध पाणी, नाही होणार आरोग्याची हानी

३१. सांडपण्याचा पुर्नवापर, जीवनाला द्या आकार

३२. पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ, नाही पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ

३३. पाणी वाचवण्याचा ध्यास, भविष्याचा होईल विकास

३४. स्वच्छ पाणी आणि सुंदर परिसर, आरोग्य राहील तुमचे निरंतर

३५. प्रत्येक गावात एक नारा, पाण्याची काटकसर करा

३६. पाण्याची शुद्धता राखा आजारपणातून मिळेल मुक्तता 

३७. पाण्याचे योग्य नियोजन, आनंदाने फुलवा तुमचे जीवन

३८. वाचवा थेंब थेंब पाण्याचा, हाच एकमेव मार्ग सुखी होण्याचा

३९. पाणी देते जीवनदान पाणी वाचवणे हेच श्रेष्ठ काम

४०. पाणी वाचवा पाणी तुम्हाला वाचवेल


जागतिक जल दिवस जगभरात 22 मार्चला साजरा करण्यात येतो. युनायटेड नेशन वॉटर (United Nations Water) या संस्थेद्वारे या  दिवसाचे आयोजन केले जातं. पृथ्वीवर जमिनीखाली पाण्याचे अनेक नैसर्गिक स्त्रोत असतात. ज्यामधून नदी, विहीर, झरे, तलावांना पाणी मिळत असतं. मात्र प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे आज हे नैसर्गिक स्त्रोत लुप्त होत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर पाण्याचा  दुष्काळ पडण्याची शक्यता दाट आहे. पाण्याच्या दुष्काळामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पुढील पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आताच याबाबत योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. यासाठी जागतिक जल दिवसानिमित्त जगभरात स्वच्छ आणि ताज्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी जागरुकता निर्माण केली जायला हवी. खरंतर यासाठी जागतिक जल दिवसाचे (International water day) आयोजन करावं लागणं हे माणसाचं खूप मोठं दुर्देव आहे. कारण निसर्गाने माणसाला बहाल केलेली जलसंपत्ती माणसाने स्वतःच्या हातानेच वाया घालवलेली आहे. ज्यामुळे पाणी वाचवा जीवन जगवा या घोषवाक्याचा प्रचार आणि प्रसार करणं आज अत्यंत गरजेचं झालं आहे. म्हणूनच यंदाच्या जागतिक जल दिवसानिमित्त या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही पाणी वाचवा घोषवाक्य नक्कीच उपयुक्त आहेत.

जागतिक जलदिनानिमित्त पाणी वाचवा घोषवाक्य - Save Water Slogans In Marathi

१. पाणी जीवन आहे त्याची काळजी घ्या

२. पाणी नाही द्रव्य ते आहे अमृततुल्य 

३. दुष्काळाची नको असेल आपत्ती, तर वेळीच जपा जलसंपत्ती

४. थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा

५. ठिंबक आणि तुषार सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात मिळेल उत्प्नन्न भारी

६. जीवन हवं असेल सुंदर तर वेळीच करा काटकसर

७. पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यात तुम्हाला जे जे हवं ते मिळवा

८. पाण्याचे संवर्धन करा आणि मुलांच्या भविष्य सुरक्षित करा

९. शुद्ध पाण्याचे नवे तंत्र,सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र 

१०. स्वच्छ पाणी, सुंदर परिसर, तुमचे जीवन होईल सुखकर

११. पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू 

१२. सांडपाण्याची करू या विल्हेवाट, गावात होईल आरोग्याची पहाट

१३. पाणी वाचवण्याची धरू या कास, सर्वांचा होईल नक्कीच विकास

१४. पाणी सिंचन क्षेत्र वाचवूया नवीन पिढीला शिकवण देऊ या

१५. बचत पाण्याची गरज काळाची 

१६. पाणी बचत करेल जीवन सुसंगत 

१७. पाण्याच्या स्वच्छतेविषयी दक्षता घेऊ, सर्व रोगराईला दूर ठेवू

१८. पाण्याचे पुर्नभरण, जीवनाचे संवर्धन

१९. थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन, पाण्याने वाचेल सर्वांचे जीवन

२०. पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा.

२१. वाचवाल पाणी आणि राबवाल जलनीती तर पळून जाईल दुष्काळाची भीती

२२. पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न

२३. पाण्याचे संरक्षण वसुधंरेचे करा रक्षण

२४. पाणी म्हणजे पृथ्वीचं स्पंदन, जीवसृष्टीसाठी आहे जीवन

२५. पाणी वापरा जपून म्हणजे भविष्य राहील टिकून

२६. स्वच्छ पाणी घरोघरी, आरोग्याची खरी हमी 

२७. पाणी म्हणजे जीवनाचे सार, याचा तुम्ही  करा विचार

२८. पाणी वाचवा जीवन वाचवा

२९. पाण्याविना जीवन बेजार, जीवसृष्टीला त्याचाच आधार

३०. पिण्यासाठी शुद्ध पाणी, नाही होणार आरोग्याची हानी

३१. सांडपण्याचा पुर्नवापर, जीवनाला द्या आकार

३२. पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ, नाही पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ

३३. पाणी वाचवण्याचा ध्यास, भविष्याचा होईल विकास

३४. स्वच्छ पाणी आणि सुंदर परिसर, आरोग्य राहील तुमचे निरंतर

३५. प्रत्येक गावात एक नारा, पाण्याची काटकसर करा

३६. पाण्याची शुद्धता राखा आजारपणातून मिळेल मुक्तता 

३७. पाण्याचे योग्य नियोजन, आनंदाने फुलवा तुमचे जीवन

३८. वाचवा थेंब थेंब पाण्याचा, हाच एकमेव मार्ग सुखी होण्याचा

३९. पाणी देते जीवनदान पाणी वाचवणे हेच श्रेष्ठ काम

४०. पाणी वाचवा पाणी तुम्हाला वाचवेल

४१. वाणी आणि पाणी जपून वापरा, वाणी जपली तर वर्तमान 
काळ चांगला राहील आणि पाणी जपलं तर तुमचा भविष्यकाळ शाबूत राहील.

४२. पाणी घ्या ओगराळ्याने, दूषित करू नका तुमच्या हाताने
जलसंवर्धन आणि जलसंरक्षण, लहान मुलांना द्या ही शिकवण

४३. प्रदूषण थांबवा पाणी वाचवा

४४. भविष्याची नको हवी असेल चिंता तर आताच पाणी वाचवा

४५. गरिब असो श्रीमंत पाणी वाचवा नाहीतर कराल खंत

४६. सुरक्षित साधन पाण्याचे, महत्त्व पटवा हातपंपाचे

४७. नका वाया घालवू पाणी आणि इंधन, हेच आहे देशाचे खरे धन

४८. पाण्याविना माणसाचा जन्म आहे व्यर्थ, पाणी वाचवण्याचे समजून घ्या महत्त्व

४९. पाण्याचे महत्त्व पटवा, भविष्याची चिंता मिटवा

५०. पाणी वाचवा, पुढच्या पिढीला काय द्यायचे हे आताच ठरवा.

जलप्रतिज्ञा