K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 24 March 2019

🗜🅿🗜🅿🗜🅿🗜🅿🗜🅿🗜

*विविध प्रवेशासाठी अत्यंत महत्वपूर्ण*



*मेडीकल* प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे👈🏿

1) *नीट* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) *नीटप्रवेश* पत्र 
3) *नीट मार्क* लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
11) आधार कार्ड
12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2019 पर्यत लागू)

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.

👉🏿 *इंजिनीअरिंग* प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे👈🏿
1) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) MHT-CET* पत्र 
3) MHT-CET* मार्क  लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) आधार कार्ड
11) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
12) राष्ट्रीय बँकेतील खाते                                         13) फोटो 
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2019 पर्यत लागू)

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्याव


*वैद्यकीय क्षेत्र* 


*शिक्षण - एमबीबीएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि सीईटी प्रवेश परीक्षा 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका 

*शिक्षण - बीएएमएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका 

*शिक्षण - बीएचएमएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - एमडी 

*शिक्षण - बीयूएमएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 

*शिक्षण - बीडीएस* 

कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - एमडीएस 

*शिक्षण - बीएससी इन नर्सिंग* 

कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र 
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 

*शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच* 

कालावधी - पाच वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र 
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय 
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 

*शिक्षण - डिफार्म* 

कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश 
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय 
पुढील उच्च शिक्षण - बीफार्म 

*शिक्षण - बीफार्म* 

कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म 

संरक्षण दलांत प्रवेशासाठी 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात. 
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात. 
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

*अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल*

*शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा* 
कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश 
संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार 
पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश 
*शिक्षण - बीई* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस 
*शिक्षण - बीटेक* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई 
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस 
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी - 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी 
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण 
कालावधी - दोन वर्षे 
पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण 

 *कॉम्प्युटरमधील कोर्सेस* 


डीओईएसीसी "ओ' लेव्हल 

कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ 
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी 
कालावधी - दोन वर्षे 
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी 
कालावधी - सहा महिने 
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन 
कालावधी - तीन महिने 
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग 
कालावधी - दहा महिने 
इग्नू युनिव्हर्सिटी 
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग 
कालावधी - एक वर्ष 

*शिक्षण - बारावी*


*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन* 
कालावधी - एक वर्ष 
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट 
कालावधी - दोन महिने 
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स 
कालावधी - एक वर्ष 
(फक्त मुलींसाठी) 
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग 
कालावधी - दोन वर्षे 
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट 
कालावधी - एक वर्ष 
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन 
कालावधी - एक वर्ष 
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट 
कालावधी - एक वर्ष 
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर 
कालावधी - एक वर्ष 

 *रोजगाराभिमुख कोर्सेस*


*शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी* 
कालावधी - तीन वर्षे 
पात्रता - बारावी (70 टक्के) 
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड 
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी 
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स 
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर 
*शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग* 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता - दहावी आणि बारावी पास 
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर 
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग 
फाउंडेशन (एनटीटीएफ) 
सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस 
कालावधी - एक वर्ष 
फॅशन टेक्‍नॉलॉजी 
कालावधी - एक वर्ष 
मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस 
कालावधी - तीन वर्षे 

*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*


*टूरिस्ट गाइड* 
कालावधी - सहा महिने 
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस 
कालावधी - दीड वर्ष 
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग 
कालावधी - तीन महिने 
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन 
सिस्टम (एअर टिकेटिंग) 
कालावधी - एक महिना 
अप्रेन्टाईसशिप 
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे 
*शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी* 
डिजिटल फोटोग्राफी 
कालावधी - एक वर्ष 
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग 
कालावधी - एक ते तीन वर्षे 
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी 
कालावधी - एक ते तीन वर्षे 

*बांधकाम व्यवसाय*


*शिक्षण - बीआर्च* 
कालावधी - पाच वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक  
*पारंपरिक कोर्सेस*

*शिक्षण - बीएससी* 
कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट 
संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी 

*शिक्षण - बीएससी(ऍग्रो)* 

कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र 
संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय 
पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन 

*शिक्षण - बीए* 

कालावधी - तीन वर्षे 
संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 
पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी 

*शिक्षण - बीकॉम* 

कालावधी - तीन वर्षे 
संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी 

*शिक्षण - बीएसएल* 

कालावधी - पाच वर्षे 
संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा 
पुढील उच्च शिक्षण - एलएलएम 

*शिक्षण - डीएड* 

कालावधी - दोन वर्षे 
प्रवेश - सीईटी आवश्‍यक 
संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक 
पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड 

*शिक्षण - बीबीए,* बीसीए,बीबीएम 

कालावधी - तीन वर्षे 
प्रवेश - सीईटी 
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए 

*फॉरेन लॅंग्वेज* 

(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, 
जॅपनीज, कोरियन) 
कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर 
कोर्सेसवर आधारित

 *फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.......*


अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. 
पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा. 
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी. उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा. 
अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या. 
अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा. 
इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा. 
काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा. 
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा. 
--------------- 
*काही महत्त्वाची संकेतस्थळे*

1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन. 
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी) 
www.dte.org.in 
2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी) 
www.dmer.org
3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी) 
www.dvet.gov.in
4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ 
www.unipune.ac.in
5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई 
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी) 
www.iitb.ac.in 
6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण 
www.aipmt.nic.in 
7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी) 
www.upsc.gov.in
(लष्करात अधिकारी म्हणून जाण्यासाठी बारावीनंतर "यूपीएससी‘ची एकमेव परीक्षा)

संकलित🙏

Saturday 23 March 2019

पहिला जागतिक चिमणी दिवस - २० मार्च २०१० रोजी पाळला गेला.




​🔹२२ मार्च : जागतिक जल दिन




           पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे !

▪️मूळ संकल्पना व सुरुवात

संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदा.२०१५ ची संकल्पना होती पाणी व शाश्वत विकास- कारण पाण्याच्या अविचारी वापराने खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल.

▪️अधिक माहिती

तहान लागल्यावर विहीर खणू लागल्याने पश्न सुटत नाही. त्यासाठी या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले पाहिजे-

― पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.
― पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.
― जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे.
― पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे.

▪️साधी तरीही अत्यंत महत्त्वाची कृती

स्वत: ला खरोखरी किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार केला तरी खूप काही साधेल!


चला जागतिक जल दिन साजरा करू या
       एखाद्या महत्वाच्या प्रश्‍नावर आपले लक्ष केंद्रीत करण्यासाठी, आपण त्या प्रश्‍नाचे महत्व जनमानसावर बिंबवण्यासाठी एखादा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून पाळतो. पाणी प्रश्‍न दिवसेंदिवस आक्राळ विक्राळ रूप धारण करीत आहे. त्यामुळे सामान्य माणसाला पाण्याचे महत्व पटावे म्हणून आपण गेल्या काही वर्षांपासून जागतिक जल दिन साजरा करीत असतो. त्या निमित्ताने पाणी प्रश्‍नावर समाजात उद्बोधक चर्चा व्हावी, पाणी प्रश्‍नाचे खरे रूप सामान्य माणसाला कळावे, जनतेनी तो प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने काही संकल्प करावेत या दृष्टीने दर वर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून पाळला जातो.

       हा जागतिक दिन साजरा करणे सुरू करण्याचा मान एका भारतीयाला जातो हे आपल्याला माहित आहे काय ? जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ, स्टॉकहोम जल पुरस्काराचे विजेते डॉ. माधवराव चितळे यांनी हा प्रश्‍न सर्वप्रथम जागतिक मंचावर मांडला. त्यावर भरपूर चर्चा होवून २२ मार्च हा दिवस निवडण्यात आला. सुरूवातील हा दिवस निवडण्याबद्दल जल तज्ज्ञात मतभेद होते. काही जण २२ मार्च बद्दल तर काही जण २२ सप्टेंबर बद्दल आग्रही होते. विषुववृत्ताने पृथ्वीचे दोन भाग पडतात. त्याचे वरचा एक भाग तर त्याचे खालील एक भाग. वरच्या भागातील देशांना २२ मार्च ही तारीख पसंत होती तर खालच्या भागातील देश २२ सप्टेंबर बद्दल आग्रही होते. खालच्या भागातील देशांपेक्षा वरच्या भागात जास्त देश आहेत हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर २२ मार्च तारीख निश्‍चित झाली हे सांगायला नको.

२२ मार्च ह्या दिवसाचे असे काय वैशिष्ट्य आहे की हा दिवस निवडला जावा ? दरवर्षी पावसाळा सुरू होण्यासाठी २२ मार्च पासून वातावरण बदल व्हावयास सुरूवात होते. त्यामुळे तात्विक दृष्ट्या पावसाळ्याची सुरूवात होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरतो हा तर्क वापरून हा दिवस निवडण्यात आला.

पाण्याशी निगडीत खरे प्रश्‍न कोणते ?

एखादी गोष्ट अति परिचित असली तर त्या गोष्टीबद्दल जास्त अज्ञान असते. पाण्याबाबत नेमकी हीच परिस्थिती आहे. याचा वापर करावयाची आपल्याला इतकी सवय लागून गेली आहे की त्याच्याशी निगडीत प्रश्‍न सतत दुर्लक्षिले जातात. पाण्याशी संबंधित प्रश्‍न नेमके कोणते आहेत त्यांची आपण यादी करू या.

१. पाण्याकडे पहाण्याची मानसिकता कशी बदलता येईल ?
२. पावसाच्या पध्दतीत होणार्‍या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल ?
३. भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल ?
४. नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल ?
५. तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल ?
६. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल ?
७. पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल ?
८. पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल ?
९. पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल ?
१०. पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल ?

मानसिकतेत बदल :

पूर्वीचे काळी लोकसंख्या खूप कमी होती. त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता जास्त होती. आता लोकसंख्या वाढीमुळे दरडोई उपलब्धता घसरली आहे. पण माणसाने पाण्याच्या वापरात मात्र काहीच बदल केले नाहीत. या उलट पाणी वापराचे नवनवीन मार्ग मात्र तो शोधित असतो. त्यामुळे पाणी प्रश्‍नाची तीव्रता वाढतच चालली आहे. ती थांबवायची असेल तर आपण आपली मानसिकता बदलून पाणी बचतीचे नवनवीन मार्ग शोधून काढावयास हवेत.

पावसाचे पध्दतीत बदल :

हवामानात होत चाललेल्या बदलामुळे पावसाच्या पध्दतीत झपाट्याने बदल होत आहेत. पावसातील नियमितपणा कमी होवून तो बेभरवशाचा होत आहे. पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. त्या बरोबर पावसाचा वेगही वाढत चालला आहे. वेगाने पडणारा पाऊस वेगाने वाहून जातो व आपले भांडे मात्र रिकामेच राहते. त्यामुळे पावसातील बदलांची नोंद घेवून आपल्याला त्याचा संग्रह कसा करता येईल याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.

भूजलाची घसरती पातळी :

पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी आपण भूजलाचा उपसा भरमसाठ वाढविला आहे. कोणत्याही प्रकारचे जल पुनर्भरण न करता निव्वळ उपसा वाढविल्यामुळे भूजल पातळी वेगाने घसरत आहे. भूजल साठे खरे पाहिल्यास राखीव स्वरूपाचे साठे आहेत. ते हात राखूनच वापरले जावेत. पण आपण मात्र आपल्या ऐहिक सुखासाठी वेगाने उपसा केल्यामुळे आज भूजलावर संकट आले आहे. हे असेच चालू राहिले तर निसर्ग आपल्याला कधीच माफ करणार नाही. कृत्रिम पध्दतीने जलसाठे कसे वाढविता येतील याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे.

नद्यांचे बारमाहीकरण :

वेगाने नद्यांचे पाणी वाहून जात असल्यामुळे पावसाळा संपताच नद्या कोरड्या पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नद्या पूर्वीसारख्या बारमाही कशा वाहू शकतील याचा विचार करावा लागणार आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात या बाबत यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. त्या प्रयोगांचे यशापयश तपासून तशी योजना देशभर राबविता येणार नाही काय याचा विचार गंभीरपणे केला जावा.

तलावांचे पुनरूज्जीवन :

ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि सिंचन या साठी तलावांचे पुनरूज्जीवन अत्यंत निकडीचे आहे. पूर्वी भारत हा तलावांचा देश म्हणून प्रसिध्द होता. आज तलावांवरील अतिक्रमाणांमुळे कित्येक तलाव बुजवण्यात आले. एवढेच नव्हे तर वाढत्या नागरी वस्तींची गरज भागविण्यासाठी तलावांचे आकार घटत आहेत. यामुळे ग्रामीण पाणी प्रश्‍नाने गंभीर रूप धारण केले आहे. यासाठी सरोवर संवर्धिनीसारखी चळवळ उभारावी लागणार आहे.

पाण्याचा पुनर्वापर :

लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे तेच ते पाणी पुन्ह: पुन्हा वापरावे लागणार आहे. आज तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे जल शुध्दीकरणाचे नवनवीन मार्ग सापडत आहेत. या मार्गांचा वापर करून पाण्याचा पुरवठा वाढविणे शक्य झाले आहे. सिंगापूर सारख्या देशात या मार्गाचा फार झपाट्याने वापर सुरू झाला आहे. अरब देश समुद्राचे पाणी शुध्द करून पिण्यासाठी सुध्दा वापरत आहेत. आज जरी नाही तरी उद्या आपल्याला सुध्दा याच मार्गाने जावे लागणार आहे.

पाण्याचे वाढते प्रदूषण :

पाण्याचा सर्वात महत्वाचा दुर्गूण म्हणजे ते कोणाशीही तात्काळ मैत्री करते. प्रदूषकांचा पाण्याशी संबंध आल्यास ते अगदी सहजपणे त्याच्या विळख्यात सापडते व चांगले शुध्द पाणी प्रदूषित होवून जाते. माणसाला होणार्‍या विकारांपैकी ९० प्रतिशत विकार प्रदूषित पाण्यामुळे होतात असे वैद्यक शास्त्र म्हणते. जिवाणू आणि विषाणू पाण्याच्या संपर्कात आले तर पाणी प्रदूषित होते. सध्या यामुळे नद्यांतील, तलावांतील एवढेच नव्हे तर भूगर्भातील पाणी सुध्दा प्रदूषित झाले आहे. यावर ताबडतोब उपचार न झाल्यास सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

पाण्याचा उत्पादक कारणासाठी वापर :

आज जगात मोअर क्रॉप पर ड्रॉप ऑफ वॉटर चे नारे लावले जात आहेत. या मानाने आपण फारच मागासलेले आहोत. कारण पाण्याचा उत्पादकतेने वापर करण्यात आपण फारच मागे पडलो आहोत. आपल्याला देशात शेतीसाठी जी सिंचम व्यवस्था वापरली जाते तिला प्रवाही पध्दती म्हणतात. या पध्दतीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुर्वापर होतो व पाण्यासारखे दुर्मिळ संसाधन आपण वाया घालवितो. देशाची प्रगती करावयाची असेल तर पाणी अधिक उत्पादक पध्दतीने वापरावे लागेल.

पाण्याचे वितरण असमाधानकारक :

पाण्याच्या वापरात आज आपल्या देशात झुंडशाही आढळते. बळी तो कानपिळी याचा प्रत्यय आपल्याला या क्षेत्रात येतो. आपल्या देशात काही लोक अति खाऊन मरतात तर काही खायला न मिळाल्यामुळे मरतात. तीच परिस्थिती पाण्याचे बाबतीत आढळून येते. काही जमिनी अति सिंचनामुळे नापिक व्हावयास लागल्या आहेत तर काही पाणी न मिळाल्यामुळे नापिक आहेत. पाणी वितरण संस्था स्थापून त्यांचे हाती हा कारभार सोपवून आपल्याला पाण्याचे समान वितरण साधावायाचे आहे.

पाण्याचे सरकारीकरण धोक्याचे :

जी गोष्ट नीट सांभाळू शकतो तीच आपल्या हातात ठेवावी हे शहाणपण आपले सरकार कधी शिकणार नकळे. आज संपूर्ण पाणी प्रश्‍न सरकारमय झाला आहे. सरकारने मोठी धरणे बांधून ठेवली पण त्याची योग्य वितरण व्यवस्था न उभारल्यामुळे त्या पाण्याचा योग्य वापरच होत नाही. नागरी पाण्याचे वितरणही समाधानकारक नाही. जल वितरणात लोकांचा सहभाग नाही व त्यामुळे पाणी प्रश्‍न सरकार निर्मित तर नाहीना असे वाटावयास लागले आहे. जागतिक बँक आपल्याला पाणी व्यवस्था सुधारा असे वारंवार सांगत आहे. पण या क्षेत्रात केली जाणारी प्रगती अत्यंत धीम्या गतीने चालू आहे.
       या सर्व प्रश्‍नांवर जलजागरण होणे आवश्यक आहे. जलदिनाच्या निमित्ताने यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. लोकांना प्रश्‍न समजला तरच त्याची उत्तरे शोधली जावू शकतील. म्हणून आपण सर्वांनी मिळून जागतिक जल दिन साजरा करू या व या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकू या.


जागतिक जल दिवस जगभरात 22 मार्चला साजरा करण्यात येतो. युनायटेड नेशन वॉटर (United Nations Water) या संस्थेद्वारे या  दिवसाचे आयोजन केले जातं. पृथ्वीवर जमिनीखाली पाण्याचे अनेक नैसर्गिक स्त्रोत असतात. ज्यामधून नदी, विहीर, झरे, तलावांना पाणी मिळत असतं. मात्र प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे आज हे नैसर्गिक स्त्रोत लुप्त होत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर पाण्याचा  दुष्काळ पडण्याची शक्यता दाट आहे. पाण्याच्या दुष्काळामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पुढील पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आताच याबाबत योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. यासाठी जागतिक जल दिवसानिमित्त जगभरात स्वच्छ आणि ताज्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी जागरुकता निर्माण केली जायला हवी. खरंतर यासाठी जागतिक जल दिवसाचे (International water day) आयोजन करावं लागणं हे माणसाचं खूप मोठं दुर्देव आहे. कारण निसर्गाने माणसाला बहाल केलेली जलसंपत्ती माणसाने स्वतःच्या हातानेच वाया घालवलेली आहे. ज्यामुळे पाणी वाचवा जीवन जगवा या घोषवाक्याचा प्रचार आणि प्रसार करणं आज अत्यंत गरजेचं झालं आहे. म्हणूनच यंदाच्या जागतिक जल दिवसानिमित्त या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही पाणी वाचवा घोषवाक्य नक्कीच उपयुक्त आहेत.

जागतिक जलदिनानिमित्त पाणी वाचवा घोषवाक्य - Save Water Slogans In Marathi

१. पाणी जीवन आहे त्याची काळजी घ्या

२. पाणी नाही द्रव्य ते आहे अमृततुल्य 

३. दुष्काळाची नको असेल आपत्ती, तर वेळीच जपा जलसंपत्ती

४. थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा

५. ठिंबक आणि तुषार सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात मिळेल उत्प्नन्न भारी

६. जीवन हवं असेल सुंदर तर वेळीच करा काटकसर

७. पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यात तुम्हाला जे जे हवं ते मिळवा

८. पाण्याचे संवर्धन करा आणि मुलांच्या भविष्य सुरक्षित करा

९. शुद्ध पाण्याचे नवे तंत्र,सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र 

१०. स्वच्छ पाणी, सुंदर परिसर, तुमचे जीवन होईल सुखकर

११. पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू 

१२. सांडपाण्याची करू या विल्हेवाट, गावात होईल आरोग्याची पहाट

१३. पाणी वाचवण्याची धरू या कास, सर्वांचा होईल नक्कीच विकास

१४. पाणी सिंचन क्षेत्र वाचवूया नवीन पिढीला शिकवण देऊ या

१५. बचत पाण्याची गरज काळाची 

१६. पाणी बचत करेल जीवन सुसंगत 

१७. पाण्याच्या स्वच्छतेविषयी दक्षता घेऊ, सर्व रोगराईला दूर ठेवू

१८. पाण्याचे पुर्नभरण, जीवनाचे संवर्धन

१९. थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन, पाण्याने वाचेल सर्वांचे जीवन

२०. पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा

२१. वाचवाल पाणी आणि राबवाल जलनीती तर पळून जाईल दुष्काळाची भीती

२२. पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न

२३. पाण्याचे संरक्षण वसुधंरेचे करा रक्षण

२४. पाणी म्हणजे पृथ्वीचं स्पंदन, जीवसृष्टीसाठी आहे जीवन

२५. पाणी वापरा जपून म्हणजे भविष्य राहील टिकून

२६. स्वच्छ पाणी घरोघरी, आरोग्याची खरी हमी 

२७. पाणी म्हणजे जीवनाचे सार, याचा तुम्ही  करा विचार

२८. पाणी वाचवा जीवन वाचवा

२९. पाण्याविना जीवन बेजार, जीवसृष्टीला त्याचाच आधार

३०. पिण्यासाठी शुद्ध पाणी, नाही होणार आरोग्याची हानी



३०. पिण्यासाठी शुद्ध पाणी, नाही होणार आरोग्याची हानी

३१. सांडपण्याचा पुर्नवापर, जीवनाला द्या आकार

३२. पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ, नाही पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ

३३. पाणी वाचवण्याचा ध्यास, भविष्याचा होईल विकास

३४. स्वच्छ पाणी आणि सुंदर परिसर, आरोग्य राहील तुमचे निरंतर

३५. प्रत्येक गावात एक नारा, पाण्याची काटकसर करा

३६. पाण्याची शुद्धता राखा आजारपणातून मिळेल मुक्तता 

३७. पाण्याचे योग्य नियोजन, आनंदाने फुलवा तुमचे जीवन

३८. वाचवा थेंब थेंब पाण्याचा, हाच एकमेव मार्ग सुखी होण्याचा

३९. पाणी देते जीवनदान पाणी वाचवणे हेच श्रेष्ठ काम

४०. पाणी वाचवा पाणी तुम्हाला वाचवेल


जागतिक जल दिवस जगभरात 22 मार्चला साजरा करण्यात येतो. युनायटेड नेशन वॉटर (United Nations Water) या संस्थेद्वारे या  दिवसाचे आयोजन केले जातं. पृथ्वीवर जमिनीखाली पाण्याचे अनेक नैसर्गिक स्त्रोत असतात. ज्यामधून नदी, विहीर, झरे, तलावांना पाणी मिळत असतं. मात्र प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे आज हे नैसर्गिक स्त्रोत लुप्त होत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर पाण्याचा  दुष्काळ पडण्याची शक्यता दाट आहे. पाण्याच्या दुष्काळामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पुढील पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आताच याबाबत योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. यासाठी जागतिक जल दिवसानिमित्त जगभरात स्वच्छ आणि ताज्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी जागरुकता निर्माण केली जायला हवी. खरंतर यासाठी जागतिक जल दिवसाचे (International water day) आयोजन करावं लागणं हे माणसाचं खूप मोठं दुर्देव आहे. कारण निसर्गाने माणसाला बहाल केलेली जलसंपत्ती माणसाने स्वतःच्या हातानेच वाया घालवलेली आहे. ज्यामुळे पाणी वाचवा जीवन जगवा या घोषवाक्याचा प्रचार आणि प्रसार करणं आज अत्यंत गरजेचं झालं आहे. म्हणूनच यंदाच्या जागतिक जल दिवसानिमित्त या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही पाणी वाचवा घोषवाक्य नक्कीच उपयुक्त आहेत.

जागतिक जलदिनानिमित्त पाणी वाचवा घोषवाक्य - Save Water Slogans In Marathi

१. पाणी जीवन आहे त्याची काळजी घ्या

२. पाणी नाही द्रव्य ते आहे अमृततुल्य 

३. दुष्काळाची नको असेल आपत्ती, तर वेळीच जपा जलसंपत्ती

४. थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा

५. ठिंबक आणि तुषार सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात मिळेल उत्प्नन्न भारी

६. जीवन हवं असेल सुंदर तर वेळीच करा काटकसर

७. पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यात तुम्हाला जे जे हवं ते मिळवा

८. पाण्याचे संवर्धन करा आणि मुलांच्या भविष्य सुरक्षित करा

९. शुद्ध पाण्याचे नवे तंत्र,सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र 

१०. स्वच्छ पाणी, सुंदर परिसर, तुमचे जीवन होईल सुखकर

११. पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू 

१२. सांडपाण्याची करू या विल्हेवाट, गावात होईल आरोग्याची पहाट

१३. पाणी वाचवण्याची धरू या कास, सर्वांचा होईल नक्कीच विकास

१४. पाणी सिंचन क्षेत्र वाचवूया नवीन पिढीला शिकवण देऊ या

१५. बचत पाण्याची गरज काळाची 

१६. पाणी बचत करेल जीवन सुसंगत 

१७. पाण्याच्या स्वच्छतेविषयी दक्षता घेऊ, सर्व रोगराईला दूर ठेवू

१८. पाण्याचे पुर्नभरण, जीवनाचे संवर्धन

१९. थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन, पाण्याने वाचेल सर्वांचे जीवन

२०. पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा.

२१. वाचवाल पाणी आणि राबवाल जलनीती तर पळून जाईल दुष्काळाची भीती

२२. पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न

२३. पाण्याचे संरक्षण वसुधंरेचे करा रक्षण

२४. पाणी म्हणजे पृथ्वीचं स्पंदन, जीवसृष्टीसाठी आहे जीवन

२५. पाणी वापरा जपून म्हणजे भविष्य राहील टिकून

२६. स्वच्छ पाणी घरोघरी, आरोग्याची खरी हमी 

२७. पाणी म्हणजे जीवनाचे सार, याचा तुम्ही  करा विचार

२८. पाणी वाचवा जीवन वाचवा

२९. पाण्याविना जीवन बेजार, जीवसृष्टीला त्याचाच आधार

३०. पिण्यासाठी शुद्ध पाणी, नाही होणार आरोग्याची हानी

३१. सांडपण्याचा पुर्नवापर, जीवनाला द्या आकार

३२. पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ, नाही पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ

३३. पाणी वाचवण्याचा ध्यास, भविष्याचा होईल विकास

३४. स्वच्छ पाणी आणि सुंदर परिसर, आरोग्य राहील तुमचे निरंतर

३५. प्रत्येक गावात एक नारा, पाण्याची काटकसर करा

३६. पाण्याची शुद्धता राखा आजारपणातून मिळेल मुक्तता 

३७. पाण्याचे योग्य नियोजन, आनंदाने फुलवा तुमचे जीवन

३८. वाचवा थेंब थेंब पाण्याचा, हाच एकमेव मार्ग सुखी होण्याचा

३९. पाणी देते जीवनदान पाणी वाचवणे हेच श्रेष्ठ काम

४०. पाणी वाचवा पाणी तुम्हाला वाचवेल

४१. वाणी आणि पाणी जपून वापरा, वाणी जपली तर वर्तमान 
काळ चांगला राहील आणि पाणी जपलं तर तुमचा भविष्यकाळ शाबूत राहील.

४२. पाणी घ्या ओगराळ्याने, दूषित करू नका तुमच्या हाताने
जलसंवर्धन आणि जलसंरक्षण, लहान मुलांना द्या ही शिकवण

४३. प्रदूषण थांबवा पाणी वाचवा

४४. भविष्याची नको हवी असेल चिंता तर आताच पाणी वाचवा

४५. गरिब असो श्रीमंत पाणी वाचवा नाहीतर कराल खंत

४६. सुरक्षित साधन पाण्याचे, महत्त्व पटवा हातपंपाचे

४७. नका वाया घालवू पाणी आणि इंधन, हेच आहे देशाचे खरे धन

४८. पाण्याविना माणसाचा जन्म आहे व्यर्थ, पाणी वाचवण्याचे समजून घ्या महत्त्व

४९. पाण्याचे महत्त्व पटवा, भविष्याची चिंता मिटवा

५०. पाणी वाचवा, पुढच्या पिढीला काय द्यायचे हे आताच ठरवा.

जलप्रतिज्ञा


Friday 8 March 2019

जागतिक महिला दिन 8 मार्च विशेष









जागतिक महिला दिनाबद्दल माहिती डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD शब्दाला Click करा

DOWNLOAD


*"स्त्रीचं जीवन - दूध ते तूप"*

चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा  होतो . तिथे एकेच ठिकाणी दूध, दही, ताक, लोणी, तूप बघून वाटलं की अरेच्या, ह्या सगळ्या स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था ! 
बघू या कसं ? 

*दूध* - दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन . कुमारिका . दूध म्हणजे माहेर . दूध म्हणजे आईवडिलांशी नातं . *सकस, शुभ्र, निर्भेळ , स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही, लगेच बेचव होतं* .त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर, निरागस दिसतं .

*दही*- कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं कि कुमारिकेची वधू  होते . दुधाचं बदलून दही होतं . दही म्हणजे त्याच अवस्थेत   थिजून घट्ट होणं . लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते . दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं . कितीही मारहाण करणारा, व्यसनी, व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी स्त्री त्याच्याप्रती  एवढी निष्ठा का दाखवते ? नवरा  'पती परमेश्वर' म्हणून ? नव्हे - *याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.*



*ताक* - सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवशीपासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात . त्यांची आता सून होते . म्हणजे  ताक होतं .

दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी . बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा  खवळलेला नवरा असो  (पित्त प्रकृती) ताक दोघांनाही शांत करतं . यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.

*ताक* म्हणजे सुनेचं सासरशी नातं . सासरी स्त्री ताकासारखी  बहुगुणी असावी लागते . सगळ्या प्रश्नावर तीच उपाय . तिथे दूध पचत नाही . *दूध पाणी घालून बेचव होतं पण  ताक मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष  संसारातल्या सगळ्या प्रश्नावर  कामी येतं .*

*लोणी* - अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं.  मग २०  वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं  तेव्हा मऊ , रेशमी , मुलायम , नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो . हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं . रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण  कण  लोणी होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही .कानावरच्या चंदेरी बटा खर तर रोज आरशात  लाजून तिला सांगत असतात. पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही . *तरुण दिसण्यासाठी ती त्यांचं तोंड काळं करते. ताकाला पुन्हा दूध व्हायचं असतं . वेडेपणा नाही का ?*

*तूप*- लोणी ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही . ते आपलं रूप बदलतं . नवर्याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते . त्याच लोण्याचं आता कढवलेलं साजूक तूप होतं . वरणभात असो शिरा असो किंवा बेसन लाडू . घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर  साजूक तूप पडतं आणि जादू घडते . देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात  बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते . *घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे तूप संपून जातं . हीच स्त्रीची  अंतिम उच्च अवस्था .*

असा अनोखा *"दूध ते तूप"* हा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास. तिला सलाम!!🙏😊 *मुलगी वाचवा मुलगी शिकवा* 🙏🙏🙏

Sunday 3 March 2019

3 मार्च जागतिक वन्यजीव दिन


आज ३ मार्च

आज जागतिक वन्यजीव दिन




           
 वन्यजीव शिकार थांबून जगातील सर्व वन्यजीव प्रजातींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने ३ मार्चला जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो.१९७० च्या सुमाराला, वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे  कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीवन दिवस साजरा करण्याचे ठरविले. या दिवशी वन्यप्राण्यांचे रक्षण, त्यांचे निसर्ग साखळीतले महत्त्व आदी विषयांवर अनेक जनजागृतीचे कार्यक्रम केले जातात. नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्य सृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा (CITES) ३ मार्च १९७३ रोजी १८० देशांनी मान्य केला म्हणून या दिवसाला महत्व आहे. जंगली पशुपक्ष्यांची शिकार तसेच त्यांचा आणि दुर्मिळ वनस्पतींचा चोरटा व्यापार तेथील स्थानिकांच्या मदतीशिवाय शक्यच होणार नाही. त्यामुळे असे न करण्याबाबत सर्वप्रथम त्यांना समजावले पाहिजे. निसर्गाच्या साखळीतला प्रत्येक घटक किड्यांपासून सिंहापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्त्वाचा आहे ही बाब सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे. वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. आज जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्के लोकसंख्या तरूण आहे. विशेष म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल ५८ टक्के लोकसंख्या तरूण आहे. म्हणून वन्यजीव संवर्धन व संरक्षण करण्यात तरूणांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. तरूणांच्या हाती केवळ त्या त्या देशाच भविष्यच नसून जगभरातील सर्व वन्यजीवांच भविष्य त्यांच्याच हाती आहे. गेल्या ४० वर्षांत जगभरातील अर्धे वन्यजीवन धोक्यात आले आहे. अधिवास धोक्यात येणे, वन्यजीव शिकार व त्यांची तस्करी अश्या अनेक अंगाने त्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. हस्तीदंतासाठी आजवर १ लाख आफ्रिकन हत्ती शिकार झालेत. खवले मांजर हा जगात सर्वाधिक मारला जाणारा सस्तन प्राणी ठरला आहे. १० वर्षांत गेंड्याच्या शिकारीत ९ हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. 
माहीती :इंटरनेट 
*माही संकलन - निसर्गकट्टा*

Saturday 2 March 2019

Let's  Speak  English
आपण इंग्रजी बोलूया.

(1) Take it  (  टेक इट ) हे घ्या. 
(2) Come in  ( कम इन ) आत या.
(3) Go  there. ( गो देअर) तिकडे जा. 
(4) Get  ready. (गेट रेडी) तयार व्हा.
(5) Get  up. ( गेट अप) उठा.
(6) Keep quite.(कीप क्वाईट)शांत बसा.
(7) Get  lost. (गेट लाॅस्ट) इथून जा.
(8) Get out. (गेट आऊट) बाहेर जा. 
(9) Keep  there.( कीप देअर) तेथे ठेवा.
(10) Help me. ( हेल्प मी) मला मदत करा.
(11) Look there. (लुक देअर) तिकडे बघा.
(12)Listen to me.(लिसन टू मी)माझे ऐका.
(13) Take  rest. ( टेक रेस्ट) विश्राम कर. 
(14) Stop.  (स्टाॅप )  थांबा. 
(15)Try again.(ट्राय अगेन)पुन्हा प्रयत्न कर.
(16) Take care. (टेक केअर) काळजी घे. 
(17)Promise  me.(प्राॅमीस मी)मला वचन द्या.
(18) Stop  there. ( स्टाॅप देअर) तेथच थांब.
(19) Come near. (कम नियर) जवळ ये. 
(20) Run now. (रन नाऊ ) आता पळा.
(21) Go  away. (गो अवे ) दूर जा. 
(22) Run  fast. (रन फास्ट) जोराने पळा.
(23) Don't  push. ( डोन्ट पुश) ढकलू नका.
(24)Take  a  chair.(टेक अ चेअर) खुर्ची घ्या.
(25) Go slowly. (गो स्लोली) हळू जा.
======================
RHYMING  WORDS (-हायमिंग वर्डस)  यमक जुळणारे शब्द
(1) MAY    DAY   RAY   PAY
      मे          डे       रे          पे 
--------------------------------------------
(2) ME       BE      RE      HE 
      मी         बी        री        ही 
----------------------------------------------
(3) NET     BET    WET    GET 
      नेट        बेट       वेट        गेट 
---------------------------------------------
(4) HOT     NOT    COT    DOT 
      हाॅट       नाॅट      काॅट      डाॅट 
---------------------------------------------
(5) CRY     DRY     FRY      TRY 
       क्राय     ड्राय       फ्राय       ट्राय 
---------------------------------------------
(6) KIT      HIT      FIT       SIT 
       किट    हिट        फिट      सिट 
---------------------------------------------
(7) BIG     PEG     DIG    FIG 
      बिग      पिग      डिग      फिग 
-----------------------------------------------
(8) BAR     CAR    JAR     WAR 
      बार        कार      जार      वार 
-----------------------------------------------
(9) SEA      TEA    PEA     LEA  
       सी          टी        पी        ली   
-----------------------------------------------
(10) NINE    FINE    LINE    WINE 
        नाईन      फाईन    लाईन     वाईन 
------------------------------------------------
(11) WENT   RENT   SENT   TENT 
        वेन्ट         रेन्ट       सेन्ट      टेन्ट 
------------------------------------------------
(12) BOLD   COLD   FOLD  GOLD 
        बोल्ड     कोल्ड    फोल्ड    गोल्ड 
------------------------------------------------
(13) DISH   FISH    WISH   PISH 
         डिश     फिश     विश       पिश 
------------------------------------------------
(14) LAST   FAST    CAST   PAST 
         लास्ट    फास्ट     कास्ट     पास्ट 
------------------------------------------------
(15) SICK   TICK   WICK   KICK 
         सिक    टिक      विक      किक
===========================
कालगणना - भौगोलिक माहिती
(१) वर्ष :-
--- पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण 
करण्यास लागणारा सुमारे ३६५ दिवसांचा 
कालावधी म्हणजे एक वर्ष होय.

(२) दिवस :-
--- पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण 
करण्यास लागणारा २४ तासांचा कालावधी
म्हणजे एक दिवस होय.

(३) चंद्रकला :-
--- पृथ्वीवरून चंद्राकडे पाहताना आपल्याला
दिसणाऱ्या चंद्राच्या सूर्याकडील प्रकाशित 
भागाचा दररोज बदलत जाणारा आकार,
म्हणजे चंद्रकला होय.

(४) आठवडा :-
--- आठवडा हे कालगणनेच एक एकक 
आहे. आठवड्याचा कालावधी सात दिवसांचा 
असतो.

(५) महिना :-
--- एका अमावास्येपासून दुसर्‍या अमावास्ये-
पर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक 
प्रदक्षिणा पूर्ण केलेली असते. या काळास 
महिना असे म्हणतात.

(६) पंधरवडा :-
--- १.पंधरवडा हे कालगणनेचे एक एकक 
आहे.२.अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंच्या पंधरा 
दिवसांच्या कालावधीत चंद्राचा पृथ्वीवरून 
दिसणारा प्रकाशित भाग रोज क्रमाक्रमाने 
वाढत जातो. ३. पौर्णिमेपासून अअमावास्ये-
पर्यंतच्या पंधरा दिवसाच्या कालावधीत चंद्राचा 
पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग रोज 
क्रमाक्रमाने कमी होत जातो. ४. या प्रत्येकी
पंधरा - पंधरा दिवसांच्या कालावधीस पंधरवडा 
असे म्हणतात.

(७) पौर्णिमा  :-
-- ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्राचा 
सूर्याकडील प्रकाशित भाग आपल्याला पूर्ण 
वर्तुळाकार दिसतो, त्या रात्रीला पौर्णिमा असे 
म्हणतात.

(८) अमावास्या :-
--- ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्राचा 
सूर्याकडील प्रकाशित भाग आपल्याला 
अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला अमावास्या 
असे म्हणतात.

===========================