K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...
Showing posts with label आरोग्यविषयक. Show all posts
Showing posts with label आरोग्यविषयक. Show all posts

Friday, 22 January 2021

 छातीत जळजळ ( ॲसिडिटी ) होण्याची कारणे, लक्षणे उपाय :-

                छातीत जळजळ होणे याला ॲसिडिटी किंवा मराठीत आपण त्याला आम्लपित्त असे म्हणतो. ह्याचा त्रास प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा होतोच!

              ॲसिडिटीचा त्रास म्हणजे आपल्या जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होते. हे आम्ल जठरात गॅस्ट्रिक ग्लॅन्डसमधून स्रवले जाते ह्यामुळे अन्नाचे पचन होते. हे हायड्रोक्लोरिक आम्ल अन्नाच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. परंतु हे जास्त प्रमाणात स्रवले गेले तर ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

 

ॲसिडिटी होण्याची कारणे :-

☘️ अपुरी झोप, जेवणाच्या वेळेत अनियमितता, प्रमाणापेक्षा जास्त खाणे, अति तेलकट, मसालेदार अन्न खाणे, विरुद्ध आहार घेणे, धुम्रपान करणे, मद्यपान करणे, सततची काळजी ताणतणाव या अशा कारणांनी छातीत जळजळ ( ॲसिडिटी ) व्हायला लागते.

      तसेच जर काही वेदनाशामक किंवा प्रतिजैविके घेतली किंवा ऍस्पिरिन सांधेदुखीची औषधे सुरू असली तरीही ऍसिडिटी वाढू शकते.

 

ॲसिडिटीची लक्षणे :-

छातीत किंवा घशात जळजळणे, पोटात आग पडणे, वारंवार कडू-आंबट पाणी घशाशी येणे, अस्वस्थ वाटणे, हातापायांच्या तळव्यांची आग होणे, करपट ढेकर येणे, अंगावर लाल रंगाच्या रॅशेस येणे, अंगाला खाज सुटणे, चक्कर येणे, आंबट उलटी झाल्यानंतर बरे वाटणे ही ॲसिडिटी वाढण्याची प्रमुख लक्षणे आहेत.


ॲसिडिटी साठी कोणते उपाय करावेत?

. आहारात बदल

ॲसिडिटी साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहारात अति तेलकट, तिखट आणि मसाल्याचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा, असे केल्याने तुम्हाला छातीत जळजळ होणार नाही.


. जेवण सावकाश करा 

जेवण करताना घाई करू नका. जेवण आरामात करा जेणेकरून प्रत्येक घास व्यवस्थित चावला जाईल. प्रत्येक घासासोबत पाचक रस व्यवस्थित मिसळला जाईल आणि अन्नाचे पाचन व्यवस्थित होईल. छातीत जळजळ होणार नाही.


. गूळ

गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. त्यामुळे आतड्याची शक्ती वाढते. त्यामुळे दररोज जेवण झाल्यानंतर छोटासा गुळाचा खडा घ्या अन तो चावून खाता तोंडात ठेवून चघळा. यामुळे पोटाची पचनक्रियेची क्षमता वाढते आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते.


. बडीशेप

जेवण झाल्यानंतर बडीशेप खाणे ही चांगली सवय आहे.  चिमुटभर भाजकी बडीशेप खाल्याने पाचनशक्ती सुधारण्यास मदत होते. अपचन आणि छातीत जळजळ यावर बडीशेप हा सोपा प्रभावी उपाय आहे.


. आवळा

जेवण झाल्यानंतर आवळा सुपारी, किंवा एक चमचा आवळ्याचा मोरावळा खा. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते.


. शहाळ्याचे पाणी

शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील पीएच ॲसिडिक लेव्हल कमी होऊन अल्कलाईन होते. ह्याने पोटात आवश्यक असलेले म्युकस सुद्धा तयार होते. ह्या म्युकसमुळे अतिरिक्त प्रमाणात ॲसिड तयार झाल्यास पोटाचे रक्षण होते. शहाळ्याच्या पाण्याने अन्नपचन सुधारते ॲसिडिटी वाढणे कमी होते.


. तुळशीची पाने

तुळशीच्या पानांमध्ये सुदींग आणि कार्मीनेटीव्ह म्हणजेच पोटाला आराम वाटावे असे गुणधर्म असतात. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास थोड्याच वेळात कमी होतो. तुम्हाला थोडीही जळजळ जाणवत असेल तर लगेच तुळशीची पाने चावून चावून खा किंवा - पाने कपभर पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्या.


. दालचिनी

 दालचिनी हे नैसर्गिक अँटासिड आहे. ह्याने बिघडलेले पोट जागेवर येते. अन्नपचन सुधारते आणि शरीरात पोषणमूल्ये शोषण्याचे कार्य सुरळीत होते. गॅस्ट्रोइंटेस्टीनल ट्रॅकमध्ये इन्फेक्शन असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर दालचिनीचा काढा उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत.

 

. ताक

 ताक म्हणजे पृथ्वीवरील अमृत आहे. छातीत जळजळत असेल तर ताजे गोड ताक नुसतेच किंवा सैंधव मीठ, किंवा कोथिंबीर बारीक चिरून त्यात घालून प्यायल्यास ताबडतोब आराम मिळतो. मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्याने जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर ताक हा त्यावरचा रामबाण उपाय आहे. ताक पोटातील ॲसिडिटी न्यूट्रलाइज करते.

 

. आलं

 आल्यामध्ये तर अनेक औषधी गुण आहेत. आल्यामध्ये अन्नपचनासाठी आवश्यक तसेच दाहशामक गुणधर्म आहेत. पोटातील ॲसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी आल्याचा तुकडा चावून चोखल्यास किंवा आल्याचा रस घेतल्यास फायदा होतो. मळमळ, उलटी, पित्त वाढणे ह्यावर आल्याचे पाचक तर ट्राईड अँड टेस्टेड औषध आहे.

 

१०. लवंग

 आयुर्वेद औषधांमध्ये लवंगीला महत्वाचे स्थान आहे. पोटाच्या विकारांसाठी लवंग गुणकारी आहे. लवंगीत कार्मीनेटीव्ह गुणधर्म म्हणजेच वात तयार न होण्याचे गुणधर्म असल्याने लवंग खाल्ल्यास गॅसेसचा त्रास होत नाही.


 ११. केळी

 केळ्यामध्ये नैसर्गिक अँटासिड्स असतात. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर केळी खाणे अतिशय चांगले आहे. केळी खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो.

 

१२. फळे

 ॲसिडिटी वाढली असताना कलिंगड, सफरचंद व डाळिंब खाल्ल्याने सुद्धा आराम मिळतोॲसिडिटी कमी होते तसेच ॲसिड रिफ्लक्स सुद्धा कमी होतो.


----------------------------------

ॲसिडिटी म्हणजे नेमके काय?

आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो अ‍ॅसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो. आपण जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची अत्यंत गरज असते, पण योग्य प्रमाणात. हाच पाचक रस जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी (म्हणजे जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त) तयार झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो. यालाच अ‍ॅसिडिटी असे म्हणतात.


अ‍ॅसिडिटी का होते?

पोटात जास्त प्रमाणात व अवेळी हा ‘आम्लयुक्त पाचकरस’ तयार होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे worry, hurry, curry.


*Hurry* – भराभरा जेवल्याने हवा गिळली जाते. म्हणून पोट फुगते, पोटाला तडस लागते.


*Worry* – अनावश्यक अतिकाळजी करत राहणे.


*Curry* – मसालेदार पदार्थ, शीतपेये, कॉफी, चॉकलेट.


आपलं आयुष्य हल्ली सुपरफास्ट झालंय. लोकांना सकाळी ब्रेकफास्ट घ्यायला पण वेळ नसतो. नुसताच चहा, कॉफी इ. पेय घेतली जातात; ज्यामुळे पोटातील अ‍ॅसिड किंवा आम्लपित्त वाढते व अ‍ॅसिडिटी जाणवू लागते.


धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण विविध टेन्शनखाली जगत असतो. ८.३० ची लोकल गाठायची, ऑफिसातल्या बॉसचं व कामाचं टेन्शन, मुलांच्या अभ्यासाचे, करिअरचे टेन्शन, बायकांना ऑफिस, मुलं, घरकाम, स्वयंपाक या सर्व गोष्टींत ताळमेळ साधायचे टेन्शन, डोक्यावर कर्ज असेल तर त्याचे अजून टेन्शन, या विविध ताणांमुळे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होत असतो व त्यामुळे जठर-रसाची निर्मिती जास्त प्रमाणात होत राहते व अ‍ॅसिडिटीची सुरुवात होते. पोटात जळजळ होणाऱ्या बऱ्याच रुग्णांना मानसिक तणावांनी ग्रासलेले असते.

            फास्ट फूडच्या जमान्यात भूक लागली की रस्त्यात उभे राहून कुठेही वडापाव, पावभाजी, पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, दाबेली इ. सटरफटर खाल्ल जातं. त्यामुळे अमिबीयासिस किंवा जियारडिआसिस यासारखे इन्फेक्शन होते व त्यामुळे अ‍ॅसिडिटी (gastritis) चा त्रास होतो.

          अयमित दिनचर्या आणि चुकीच्या खान-पानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. यामुळे पोटात गॅस किंवा वाताची समस्या सुरु होते आणि याच गॅस्ट्रिक ट्रबलमुळे शरीरात इतर आजार निर्माण होतात.   ज्या लोकांना ही समस्या असते त्यांना ॲसिड रिफ्लक्सचा त्रास सुरु होतो. तुम्हालाही वारंवार गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर फक्त एका महिन्याच्या शास्त्रशुद्ध हर्बल ट्रीटमेंट ने  तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून कायमचा आराम मिळेल व दिनचर्येतील योग्य त्या बदलाने ही समस्या परत उद्भवणारही नाही.


गॅसची समस्या निर्माण होण्याचे खास लक्षणं -


1. मळमळ

2. उलटी

3. वारंवार उचकी

4. पोटदुःखी आणि सूज

 

पाणी प्यावे -

पाणी न पिणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता हे या आजाराचे मोठे कारण आहे.


रात्री भरपेट जेवून तत्काळ झोपणे, रात्री खूप उशिरा झोपणे, कॉल सेंटर किंवा शिफ्टबदलीच्या नोकऱ्या. यामुळे रात्री जागरण व दिवसा अपुरी झोप यामुळे अ‍ॅसिडिटी बळावते.


मद्यपान करणे, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा कुठल्याही दुखण्यासाठी ब्रुफेन किंवा त्यासारखे वेदनाशामक औषध घेत राहणे, आहारात जास्त तेलकट, तिखट, जळजळीत मसाल्याचे पदार्थ घेतल्यानेही अ‍ॅसिडिटी वाढते. अन्नातील तिखटपणा हिरवी मिरची, लाल मिरची, आले-लसूण पेस्ट, मिरपूड इ. या पदार्थानी येतो. असे पदार्थ सर्वाना सोसतीलच असे नाही. ज्या लोकांना असे पदार्थ सोसत नाहीत, त्यांना पोटात किंवा छातीत जळजळ/ विस्तव पेटविल्यासारखे वाटते.


अतिकडक उपवास किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने पोटात अ‍ॅसिडिटी होते. शिळे अन्न खाल्लय़ाने पोटातले आम्लपित्त वाढते आणि गॅसेस व ढेकर येऊ लागतात.


भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत हा मूल्यवान मुद्दा आपण विसरतो व अनेकदा दोन घास जास्तीचे खातो. त्यामुळेदेखील आम्लपित्त वाढते व आंबट ढेकर येऊ लागतात.


संकलित

Thursday, 27 December 2018

 Chikunguny Fever - Causes, Symptoms And Treatment Of It!

          The tiny mosquito can pose a lot of health issues. While malaria was the only dreaded disease until some time ago, the incidence of chikungunya is constantly on the rise. In fact, the nonspecific symptoms and absence of vaccination make it extremely difficult to prevent and diagnose this in the early stages.

Causes: First described in the African continent (Tanzania), the word chikungunya means “to walk bent over” in the Makonde or Kimakonde language. This appearance is because of the effect on bones, leading to severe bone and joint pains. More than 90% of the people who are bitten by the infected mosquito develop symptoms.

Chikungunya is a member of the Togaviridae family and is transmitted by bites of the infected female mosquito. In rare cases, the infection can spread through blood transfusions of the infected person.

After entering the bloodstream, it divides and multiplies rapidly in different types of cells including epithelial cells, endothelial cells, and connective tissue cells. These produce the symptoms including the rashes and the joint pains.

Symptoms: The challenge with chikungunya is that there is no specific, telltale symptom indicative of the condition. The patient develops nonspecific symptoms as below, somewhere between 4 to 7 days after the infected mosquito bite.

High fever (as high as 40 degrees Celsius)

Pain involving multiple joints which can be debilitating

Headache

Nausea and vomiting

Muscle pain



Skin rashes

Swelling around the joints

Conjunctivitis

Though the disease is not fatal, it can be quite limiting. The fever and other symptoms may disappear within a week, but the joint pains can last up to 6 months to a year.

Diagnosis: A blood test is the most diagnostic test for confirming the disease. Dengue fever and Zika virus need to be ruled out, as their presentation is very similar.

Treatment: There is no definitive treatment for this condition and it is mostly symptomatic.

The patient is advised rest to recover from the fever and fatigue

Pushing fluids, including juices and electrolytes is recommended to prevent dehydration

Fever needs to be managed with antipyretic medications

Joint pain can sometime lasts for 1 year and patient may find problem with daily activities. It can, however, be managed with nonsteroidal painkillers

Avoid aspirin as it increases the tendency to bleed

Check with your doctor to see if your regular medications need to be revisited
There is no vaccine to prevent chikungunya, though virus like particles that can be a potential vaccine are in the final stages of trials. Prevention of mosquito bites is also highly recommended as an important step in controlling the disease.
In case you have a concern or query you can always consult an expert & get answers to your questions!

Friday, 14 December 2018

आरोग्यविषयक

मॉर्निंग वॉक शरीरासाठी आरोग्यदायी!


01/06
अनेक लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याचा कंटाळा येतो. परंतु रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याचे अनेक फायदे आहेत.

02/06
सकाळी उठून मॉर्निंग वॉकला गेल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

03/06
दररोज सकाळी मॉर्निंग वॉक केल्यामुळे मन प्रसन्न आणि उत्साही राहण्यास मदत होते.

04/06
सकाळची हवा दिवसभराच्या वातावरणापेक्षा शुद्ध समजली जाते. त्यामुळे सकाळच्या मॉर्निंग वॉकमुळे शरीराला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते.

05/06
सकाळची सुर्यकिरणं कोवळी असतात. शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी सकाळचं कोवळं ऊन फायदेशीर ठरतं. त्यामुळे हाडं बळकट होण्यास मदत होते.

06/06
मॉर्निंग वॉकमुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.


हॊम फ़ोटोफ्लिक हेल्थशरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर!

शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर!

   
01/05
शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांमध्ये पोटॅशियमचाही प्रामुख्याने समावेश होतो. पोटॅशियममध्ये मुबलक प्रमाणात खनिजं असून ते हृदय, किडनी, मेंदू आणि स्नायूंसाठी फायदेशीर ठरतं. हे शरीराला हायड्रेट करण्यासाठी मदत करतं. तुमच्या दैनंदीन गरजा पूर्ण करण्यासाठी पोटशियमयुक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. पोटॅशियम शरीरातील फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्यासाठी उपयोगी ठरणारं एक आवश्यक पोषक तत्व आहे.

02/05
शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण वाढविण्यासाठी रताळ्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. रताळ्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं. नर्वस सिस्टिम सक्रिय ठेवण्यासाठी पोटॅशियम आवश्यक ठरतं. याव्यतिरिक्त रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी6 देखील असतं.

03/05
संत्र्यासारख्या आंबट फळामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असलं तरिही संत्र पोटॅशियमचा एक चांगला स्त्रोत आहे. संत्र्याचा ज्यूस व्हिटॅमिन्स, खनिजं आणि अॅन्टी-ऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असतो.

04/05
पालकामध्ये फार कमी प्रमाणात कॅलरी असतात. तसेच पालक प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि खनिजांचा भंडार आहे. पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या अॅन्टी-ऑक्सिडंटच्या प्रमुख स्त्रोत असतात. पालक पोषक तत्व आणि पोटॅशियमचा एक मोठा स्त्रोत आहे. यामधून इतर आवश्यक व्हिटॅमिन्स आणि खनिजं मिळण्यास मदत होते.

05/05
डाळिंबाचे दाणे आणि त्याचा ज्यूस पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. या इतर पोषक तत्वांसोबत फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असतं.

हॊम फ़ोटोफ्लिक हेल्थवेळीच व्हा सावध ! जाणून घ्या जेवण न करण्याचे दुष्परिणाम

वेळीच व्हा सावध ! जाणून घ्या जेवण न करण्याचे दुष्परिणाम

   
01/09
1.धावपळीच्या आयुष्यात आपल्याला बऱ्याचदा जेवणासाठी वेळच मिळत नाही. तर अनेकदा काही किलो वजन घटवण्याच्या नादात आपण मुद्दाम जेवण टाळतो. पण, या सवयीची तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

02/09
2. लक्ष्य केंद्रीत होत नाही : ग्लुकोजच्या मदतीनं आपल्या मेंदूचे कार्य सुरू असते. यामुळे योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण न जेवल्यास रक्तातील साखरेची पातळी खालावते आणि आपण आपले लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता गमावू शकता.

03/09
3. चिडचिड होते : बऱ्याचदा भुकेमुळे आपली जास्त चिडचिड होते, हा अनुभव प्रत्येकानं घेतला असेलच. रक्तातील साखरेची पातळी खालावल्यानं मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो. तुमची मनःस्थिती मिनिटा-मिनिटाला बदलते. पोटात जेवण न गेल्यानं काहींना प्रचंड राग येतो, चिडचिड होते तर अस्वस्थही वाटते.

04/09
4. प्रमाणाबाहेर खाणे : वेळच्या वेळेत जेवण न झाल्यानं बरेच जण दिवसा अखेरीस प्रमाणाबाहेर खाणे पोटात ढकलतात. भूक असताना खाद्यपदार्थ पोटात न गेल्यास अनेकांना नंतर भूक न लागण्याचा आजार होऊ शकतो. तर काही जणांना प्रमाणाबाहेर खाण्याची सवय लागते. त्यामुळे वजन घटवण्याचा कितीही प्रयत्न केल्यास तुमच्या प्रयत्नांना यश येणार नाही.

05/09
5. वजन वाढते : वेळेत जेवण न करण्याचा वाईट परिणाम तुमच्या चयापचय प्रक्रियेवरही होऊ शकतो. याची मोठी किंमत तुमच्या शरीरालाच चुकवावी लागते. चयापचय प्रक्रियेवर परिमाण झाल्यानं फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.

06/09
6. चक्कर येणे : भुकेले राहिल्यानं अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.

07/09
7.तणाव येणे : भुकेल्या अवस्थेत असताना आपल्या शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे आपल्याला तणाव जाणवू लागतो.

08/09
8. अन्य आजारांना आमंत्रण : जेवण सोडल्यानं कोणतीही शारीरिक समस्या निर्माण होणार नाही, असे तुम्हाला वाटत असल्यास तो तुमचा गैरसमज आहे. वजन घटवायचं असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतरानं खात राहा

09/09
9.योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार आणि व्यायाम करणंच तुम्हाला मदत करू शकेल.
--------------------------------------------------------

हॊम फ़ोटोफ्लिक हेल्थ'हे' 5 चहा वजन कमी करण्यासाठी ठरतात उपयोगी!

'हे' 5 चहा वजन कमी करण्यासाठी ठरतात उपयोगी!

   
01/06
भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर बेड टी पिण्याची सवय असते. यातील अनेक लोकं अशीही असतात, ज्यांना चहा नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर दूधाचा चहा पिणाऱ्या व्यक्ती फार जास्त आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? असे काही चहा आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरताच पण त्याचबरोबर हे तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतील...

02/06
व्हाइट-टी शरीरातील नवीन फॅट सेल्स तयार होण्यापासून थांबवण्याचं काम करते. यावर इतर चहांच्या तुलनेत कमी प्रक्रिया करण्यात येतात. ग्रीन टी पेक्षा जास्त अॅन्टी-ऑक्सिडंट यामध्ये आढळून येतात. हा चहा हृदयाचे आरोग्य राखण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यासोबतच आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरते.

03/06
उलॉन्ग टी फॅट सेल्स बर्न करण्यासाठी लाभदायक ठरतो. या चहाचे सेवन केल्यामुळे दोन आठवड्यांमध्ये सहा किलो वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

04/06
लेमन टी वजन कमी करण्यासाठी मदत करते. तुम्हाला तुमचे वजन वाढल्यासारखे वाटत असेल तर या चहाचे सेवन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.

05/06
अश्वगंधा टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर हा चहा तुम्हाला मदत करतो. शरीरातील हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्याचे काम हा चहा करतो. तसेच फॅट सेल्स फॅट कमी करण्यासाठी मदत करतो.

सकाळचा नाश्ता जेवणापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो का?

सकाळचा नाश्ता जेवणापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो का?





इडली सांबार
जुनी म्हण आहे - न्याहरी राजासारखी, दुपारचं जेवण राजासारखं आणि रात्रीचं जेवण फकीरासारखं असावं. म्हणजे सकाळी भरपूर नाश्ता केला पाहिजे. त्यामुळे दिवसभर मानसिक आणि शारीरिक मेहनतीसाठी ऊर्जा मिळते.

आशिया असो वा अमेरिका, न्याहरी न करणं बऱ्याच देशांमध्ये चुकीचं मानलं जातं. खरंतर जगभरात सकाळचा नाश्ता न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अमेरिकेत तीन चतुर्थांश लोकच नियमित नाश्ता करतात तर केवळ दोन तृतियांश ब्रिटिश नागरिक नियमित न्याहरी घेतात.

ब्रेकफास्ट म्हणजेच रात्रभर उपाशी असण्याचं चक्र ब्रेक करणं. शरीर रात्री अंगात असलेल्या ऊर्जेचा वापर शरीराची वाढ आणि पुनर्निमाणासाठी करतं.

ब्रिटिश आहारतज्ज्ञ सारा एल्डर सांगतात, "संतुलित नाश्ता केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. यातून शरीराच्या विकासासाठी गरजेचं प्रथिनं आणि कॅल्शिअम मिळतं."

न्याहारी खरंच महत्त्वाची आहे का?
मात्र सकाळच्या नाश्त्याला इतकं महत्त्व दिलं जावं की नको, यावर आता तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसू लागले आहेत.

हल्ली उपाशी राहण्याची क्रेझ आली आहे. शिवाय सकाळच्या नाश्त्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या डबाबंद कडधान्यात अतिप्रमाणात साखर असणंही आरोग्यासाठी चांगलं नाही, असं काही जण मानतात.

एका संशोधनाने तर सकाळचा नाश्ता घातक असल्याचं म्हटलं आहे.

मग अखेर सत्य काय आहे? दिवसाची सुरुवात करण्यासाठी नाश्ता आवश्यक आहे? की मग सकाळच्या नाश्त्यासाठी कडधान्य विकणाऱ्या कंपन्यांचं हे कारस्थान आहे?

प्रतिमा मथळा
मिसळपाव
ब्रेकफास्टबद्दल सर्वाधिक संशोधन होतं ते म्हणजे त्याच्या लठ्ठपणाशी असलेल्या संबंधावर. शास्त्रज्ञ याबाबत वेगवेगळी मतं मांडतात.

अमेरिकेमध्ये 50 हजारांहून जास्त जणांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यात जे लोक सकाळचा नाश्ता करतात, त्यांचा BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स संतुलित असल्याचं आढळलं. या तुलनेत रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांचा BMI जास्त आढळला.

संशोधकांच्या मते नाश्ता केल्याने तुम्हाला समाधान मिळतं. तुमची रोज कमी कॅलरी खर्च होते.

ब्रेकफास्टमुळे खाण्या-पिण्यावरही नियंत्रण येतं. सकाळच्या नाश्त्यामध्ये घेतले जाणारे पदार्थ हे तंतुमय आणि पौष्टिक असतात. यामुळे नंतर घेण्यात येणाऱ्या जेवणाप्रती इन्सुलिनची संवेदनशीलताही वाढते. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी जोखमीचं ठरू शकतं.

ब्रेकफास्ट आणि लठ्ठपणाचा संबंध
मात्र सकाळी नाश्ता न केल्यामुळे लठ्ठपणा वाढतो की न्याहारी न करण्याची सवय आणि लठ्ठपणा एकाचवेळी असणं केवळ योगायोग आहे, हे मात्र या संशोधनातून स्पष्ट झालं नाही.

52 लठ्ठ महिलांवर याविषयी स्वतंत्र संशोधन करण्यात आलं. या स्त्रिया दिवसभरात सारख्या कॅलरीचे पदार्थ घ्यायच्या. मात्र नाश्त्यामध्ये त्यातल्या निम्म्या कॅलरीजच घ्यायच्या.

या संशोधनाचा निष्कर्ष असा निघाला की सकाळी नाश्ता केल्यामुळे नव्हे तर रोजच्या सवयी बदलल्यामुळे वजन कमी झालं. काही स्त्रियांनी नाश्ता कमी केला. मात्र त्यामुळे त्यांचं वजन कमी झालं नाही.

प्रतिमा मथळा
नाश्ता जेवणापेक्षाही महत्त्वाचा असतो हे संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
आता जर वजन कमी करण्यासाठी न्याहारी वगळून भागणार नसेल तर लठ्ठपणा आणि न्याहारी न घेणं या दोघांमध्ये काय संबंध आहे?

नाश्ता न करणाऱ्यांना बरेचदा या जेवणाचं महत्त्व माहीत नसतं, असं ब्रिटेनच्या अॅबरडीन विद्यापीठातील अॅलेक्झॅन्ड्रा जॉन्स्टन म्हणतात.

अॅलेक्झॅन्ड्रा म्हणतात, "न्याहारी करणाऱ्यांना आरोग्यदायी पदार्थ खाण्याची सवय असते. यामुळे त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. उदारहणार्थ, सकाळी नियमितपणे नाश्ता करणारे धूम्रपान करत नाहीत."

2016साली न्याहारी आणि वजन कमी करण्याची मोहीम यांच्यातला संबंध समजवून सांगण्यासाठी 10 अनुभवांची सरासरी काढून एका निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नियमित नाश्ता केल्याने वजन कमी होतं, याचे कुठलेच पुरावे सापडले नाही.

खावं की उपवास करावा?
रात्रभर उपाशी राहून सकाळी खाण्याकडे कल वाढताना दिसतोय. विशेषतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये.

2018साली करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार कधी-कधी उपवास केल्याने रक्तातील शर्करेचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. इन्सुलिनप्रति संवेदनशीलता वाढते. यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

प्रतिमा मथळा
वडापाव
आता नाश्ता न करणं फायदेशीर असेल तर नाश्ता केल्याने नुकसान होतं का? काही संशोधक हाच दावा करतात आणि सकाळचा नाश्ता घातक असल्याचं सांगतात.

मात्र सकाळचा नाश्ता मुळीच चुकवायला नको, असं ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे आहारतज्ज्ञ फ्रेडरिक कार्पे म्हणतात.

न्याहारी सकाळी आपल्या शरीराचं मीटर सुरू करण्यासाठी खूप महत्त्वाची असते. फ्रेडरिक सांगतात, "आपल्या शरीरातल्या पेशी आहाराला चांगला प्रतिसाद देतात. त्यासाठी तुम्ही कर्बोदकयुक्त पदार्थांपासून सुरुवात केली पाहिजे. इन्सुलिन गेल्यावर शरीर प्रतिक्रिया देतं, यासाठी न्याहारी गरजेची आहे."

नाश्ता न केल्याने आपल्या शरीराचं घड्याळ म्हणजेच सर्केडियन क्लॉकसुद्धा बिघडतं. रात्री उशिरा जेवल्याने शरीरात कॉर्टिसॉल वाढतं.

जे सकाळी नाश्ता करत नाहीत ते रात्री चांगलं जेवतात. तर काही असेही असतात जे रात्री उशिरा जेवतात. जे रात्री उशिरा जेवतात त्यांच्यात लठ्ठपणा वाढण्याची शक्यता वाढते. त्यांना हृदयरोग आणि मधुमेह होण्याची शक्यताही असते.

Image copyrightGETTY IMAGES
प्रतिमा मथळा
पोहे
एकूणच या जाणकारांच्या मते सकाळच्या नाश्त्यापेक्षा महत्त्वाचं असतं रात्रीचं जेवण. अॅलेक्झॅन्ड्रा म्हणतात, "आपल्या रक्तात शर्करेचं प्रमाण सकाळी सर्वाधिक संतुलित असतं. रात्री उशिरा जेवल्यास त्यावेळी शरीरात साखरेचं प्रमाण वाढतं."

मात्र न्याहरी सोडून रात्रीच्या जेवणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अॅलेक्झॅन्ड्रा सांगतात आपल्या शरीराचं घड्याळ एखाद्या ऑर्केस्ट्रॉसारखं असतं. एक मास्टर घडी मेंदूत असते. मग इतर घड्याळं शरीरातल्या सर्व अवयवांमध्ये असतात. यांच्यावर प्रकाशासारख्या इतर बाबींचा परिणाम होत असतो.

जेवताना तुम्हाला योग्य प्रकाश मिळत नसेल तर शरीराच्या घड्याळीचं संतुलन बिघडतं. त्यावेळी शरीरातील दोन ऑर्केस्ट्रा सूरात सूर मिसळू शकत नाही. तर प्रत्येक जण आपापलं तुणतुणं वाजवतो.

कुठल्या वेळी खाण्याचे काय फायदे-तोटे होतात, यावर ब्रिटनमधल्या सरे आणि अॅबरडीन विद्यापीठांमध्ये सध्या संशोधन सुरू आहे. यानंतर त्याचा लठ्ठपणा आणि लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्याशी संबंध तपासला जाईल.

न्याहारी आरोग्याची गुरूकिल्ली
सकाळच्या नाश्त्याचा संबंध केवळ शरीराच्या वजनाशी नाही. नाश्ता चुकवल्याने हृदयरोग होण्याची शक्यता 27 टक्क्यांनी वाढते, मधुमेहाची शक्यता 21 टक्क्यांनी वाढते तर इतर आजार होण्याची शक्यता 20 टक्क्यांनी वाढते.

यामागे कदाचित न्याहारीत दडलेली आरोग्याची गुरुकिल्ली असावी. जे नाश्त्यामध्ये कडधान्य किंवा ओट्स इत्यादी खातात त्यांना यातून विटामिन्स, आयर्न आणि कॅल्शिअम मिळतात. हे आरोग्यासाठी लाभदायी असतात.

असं संशोधन ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत झालेलं आहे.

प्रतिमा मथळा
साबुदाणा वडा
सकाळी नाश्ता केल्याने मेंदू उत्तमरीत्या काम करतो, असंही म्हटलं जातं. यामुळे मन एकाग्र करणं आणि भाषेचं ज्ञान मिळवण्यातही मदत होते. यामुळे स्मृती उत्तम राहत असल्याचंही एका संशोधनात आढळलं आहे.

मात्र त्यासाठी आपण न्याहरीत काय खाते, हे महत्त्वाचं आहे. जे अधिक प्रोटीन आणि कॅल्शिअमयुक्त नाश्ता करतात, त्यांना जास्त फायदा होतो. शिरा-पुरी खाऊन तसं पोषण मिळणार नाही.

सकाळच्या नाश्त्यामध्ये डबाबंद पदार्थ टाळलेलेच बरे, कारण त्यात वरून साखर मिसळलेली असते.

Image copyrightGETTY IMAGES
प्रतिमा मथळा
छोले भटुरे
सकाळच्या भुकेवर ताबा मिळवणं सोपं असल्याचं इस्रायलच्या तेल अविव विद्यापीठातल्या संशोधनात समोर आलं आहे.

कुठल्या प्रकारचा नाश्ता आरोग्यासाठी सर्वोत्तम असतो, हे 54 संशोधनाचा अभ्यास करूनही तज्ज्ञांना अजून सांगता आलेलं नाही.

तर मग न्याहरीचं करावं तरी काय?
जाणकार सांगतात न्याहरीत काय खावं, हे माहिती नसलं तरी हे तर नक्कीच माहिती आहे की तेव्हाच खावं जेव्हा भूक लागली असेल. ज्यांना सकाळी भूक लागते त्यांनी न्याहरी जरूर करावी. ज्यांना रात्री भूकेची जाणीव होते त्यांनी रात्रीचं जेवण उत्तम करावं.

प्रतिमा मथळा
मेदूवडा
प्रत्येक शरीराचं स्वतःच वैशिष्ट्य असतं. त्यानुसारच निर्णय घेणं योग्य असतं. कुठल्याही एका जेवणावर विसंबून राहणं योग्य नाही, मग ते डिनर असो की ब्रेकफास्ट.

संतुलित ब्रेकफास्ट आणि संतुलित डिनरचा सल्ला तर सर्वच जाणकार देतात