K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 25 February 2021

विश्वकर्मा जयंती (मराठी माहिती)

       सृष्टीचा सृजनकर्ता म्हणून विश्वकर्माकडे पाहिले जाते. शास्त्रांमध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता, असे म्हटले आहे. परंतु, देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते. सृष्टीचा सृजनकर्ता म्हणून विश्वकर्माकडे पाहिले जाते.                    शास्त्रांमध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता, असे म्हटले आहे. परंतु, देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते. देशातील काही ठिकाणी दिवाळीत, तर काही ठिकाणी माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. मात्र, बहुतांश ठिकाणी भाद्रपद वद्य संक्रांतीला विश्वकर्मा पूजनाची परंपरा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते.               

       सृष्टीच्या प्रारंभी केवळ विश्वकर्मा अस्तित्वात होता. समस्त प्राणीसृष्टीचा विश्वकर्मा जनक मानला गेला आहे. एक वैदिक देवता असा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. पुराणे व महाभारत यात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. ब्रह्मांच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन औजारे शोधलीत. सौर उर्जा वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते. सूर्य शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णू, शिव व इंद्रासाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला. ते हरहुन्नरी होते. शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, पुष्पक विमान आदींची निर्मिती त्यांनी केली. हजारो यंत्र-तंत्र, शस्त्रास्त्रे व साधनांची त्यांनी निर्मिती केली. सोनार, लोहार, सुतार, कुंभार, कासार समाजबांधव त्यांना आपले दैवत मानतात. कलियुगातही विश्वकर्मा यांचे पूजन अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. जाणून घेऊया. विश्वकर्मांनी इंद्रासाठी इंद्रलोक, सुतलनामक पाताळलोक, श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ, गरूड भवन आदींची निर्मिती केली. विश्वकर्मा यांनी श्रीरामांना सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान, विश्वकर्मा पुत्र नल व नील यांनी रामसेतू बांधला. विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास, वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी, स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक आदींची रचना केली. याशिवाय जगन्नाथ पुरी येथील भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती, लंका, श्रीकृष्णांची द्वारका अशा अनेकविध दिव्य वास्तूंची निर्मिती विश्वकर्मांनी केली होती, असे सांगितले जाते.

विश्वकर्मा जयंती – ​कलियुगातील विश्वकर्मा पूजन

        भारतात १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय श्रम दिवस आणि त्यांची जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विश्वकर्मा यांची पूजा केली जाते, स्मरण केले जाते. या दिवशी उपलब्ध सर्व शस्त्रांची, दररोज उपायोगात येणारी यंत्रे, तंत्रे यांचे पूजन केले जाते कलियुगात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण लॅपटॉप, मोबाइल आणि टॅबलेट अगदी दररोज वापरतो. हीदेखील यंत्रे आणि शस्त्र आहे. यांशिवाय आपले पानही हलत नाही. त्यामुळे या यंत्रांचे पूजन करणे लाभदायक ठरते, असे सांगितले जाते. विश्वकर्मा पूजनाच्या निमित्ताने या यंत्र, शस्त्रांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी, असे सांगितले जाते.

विश्वकर्मा जयंती – ​कोणाचे करावे पूजन?

       भाद्रपद वद्य संक्रांतीला असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त घर आणि कारखाना किंवा कार्यालयात वापरल्या जाणाऱ्या अवजारे, शस्त्र, हत्यारे, यंत्रे यांचे पूजन केले जाते. सर्व अवजारे, शस्त्रे, हत्यारे, यंत्रे यांची स्वच्छता केली जाते. त्याला तेल-पाणी, ग्रीसिंग केले जाते. यानंतर विश्वकर्मा पूजन केले जाते. कार्यालय व कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रसादाचे वाटप केले जाते. उपस्थित सर्वजण एकमेकांना विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतात आणि विश्वकर्मा यांचे मनोभावे स्मरण करतात. ब्रह्मांडातील प्रथम शिल्पकार, वास्तुकार आणि अभियंता म्हणून विश्वकर्मा यांची ख्याती आहे.

​विश्वकर्मा जयंती – विश्वकर्मा पूजा विधी

       विश्वकर्मा पूजनात कलश, अक्षता, फुले, मिठाई, फळ, सुपारी, धूप, दीप, रक्षासूत्र, दही आणि विश्वकर्मा यांची तसबीर आदी पूजासाहित्य एकत्र करावे. यांनतर अष्टदलाची रांगोळी काढावी. यानंतर एका चौरंगावर विश्वकर्मा यांची तसबीर स्थापन करावी. विश्वकर्मा यांची पंचोपचार पूजा करावी. यानंतर अक्षता, चंदन, हळद-कुंकू अर्पण करावे. ऋतोकालोद्भव फुले, फळे, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. विश्वकर्मा यांचे स्मरण करावे. यानंतर कारखान, कार्यालयातील सर्व अवजारे, हत्यारे, शस्त्रे, यंत्रे यांचे पूजन करावे. या सर्वांना गंधाक्षत अर्पण करावे. यावेळी ॐ पृथिव्यै नमः ॐ अनंतम नमः ॐ कूमयि नमः ॐ श्री सृष्टतनया सर्वसिद्धया विश्वकर्माया नमो नमः, असे मंत्र म्हणून कलशातील पाणी अवजारे, शस्त्रे, यंत्रे यांच्यावर शिंपडावे. यानंतर सर्व उपस्थितांनी विश्वकर्मांची आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे.


विश्वकर्मा जयंती – ​विश्वकर्मा पूजनाचे महत्त्व

       भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये विश्वकर्मा पूजनाला विशेष महत्त्व आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या अवजार, शस्त्रे, यंत्र, हत्यारे यांच्या पूजनालाही महत्त्व आहे. या माध्यमातून त्यांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो. आपल्यासाठी झटणाऱ्या अगदी निर्जीव गोष्टींचाही आपण मान राखला पाहिजे, असा महत्त्वाचा संस्कार यामधून होतो, असे सांगितले जाते. तसेच या पूजनामुळे यंत्रे, शस्त्रे, हत्यारे, अवजारे आपला विश्वासघात करत नाहीत. कोणत्याही प्रसंगात आपली साथ कायम ठेवतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.


विश्वकर्मा यांच्या जन्माची कथा

       विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. एका शास्त्रानुसार, ब्रह्म देवाचे पुत्र धर्म, धर्माचे पुत्र वास्तूदेव आहे. वास्तूदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. स्कंद पुराणाप्रमाणे, धर्म ऋषींचे आठवे पुत्र प्रभास होते. प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला. भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. तर, महाभारतातही विश्वकर्मांचा उल्लेख आढळतो. वराह पुराणानुसार, ब्रह्म देवांनी विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली.

विश्वकर्मा यांची आश्चर्यकारक निर्मिती

       विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल, वास्तू, शस्त्र यांची निर्मिती केली. महर्षी दधिची यांच्या हाडांपासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वर्ज निर्माण केले, अशी मान्यता आहे. या व्रजाच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता. वज्रासह, श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले जाते. याशिवाय, महादेवाचे त्रिशूळ, विष्णूंचे सुदर्शन, यमराजाचा कालदंड, कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केली आहे


संत साहित्यातून संकलित केलेली माहिती.

No comments:

Post a Comment