K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 28 February 2021

 💊 *राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम* 💊


*दि.01/03/2021* रोजी शाळा व अंगणवाडयांमध्ये मुलांना (वय वर्ष १ ते १९) जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम आहे.


*जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम*


- रक्तक्षय (अँनिमिया )

-पोटदुखी,उलट्या, अतिसार, मळमळणे

-भूक मंदावणे

-कुपोषण

-थकवा व अस्वस्थता

-शौचाच्या वेळेस रक्त पडणे

-आतड्याला सूज येणे.


*जंताचा प्रादुर्भाव थोपविण्याचे मार्ग*

-जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे

-भाज्या व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे

-स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे.

-पायात चपला,बुट घालावेत

-नियमित नखे कापावित

-शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचाला बसु नये

-परिसर स्वच्छ ठेवावा.


*जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे*

-रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो

-बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

-शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते

-आरोग्य चांगले राहते.


🔹 *जंतनाशक गोळी- अल्बेंडेझाॅल ४०० मि.ग्रॅम* 


वय १ ते २ वर्ष अर्धीगोळी (२०० मि ग्रॅम)क्रश करून पाण्यात विरघळून


वय २ ते ३ वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून 


वय:- ३ ते१९वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) चघळून खाऊ घालणे. 


🔵प्रत्येक शाळा,अंगणवाडीत *दि 01/03/2021* रोजी जंतनाशक गोळी मुलांना प्रत्यक्ष समोर उभे करुन खाऊ घालण्याची मोहिम हाती घ्यावयाची आहे.


 या दिवशी गोळी दिलेल्या मुलांच्या नावापुढे *A*अशी खुण करणे.


शाळाबाहय मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात गोळया देण्यात येणार आहेत.


*गोळी खाऊ घालण्यापूर्वी घ्यावयाची काळजी*


-आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे.रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.

-प्रत्येक शाळेत एक आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहे.

-आजारी बालकांना गोळी देऊ नये.ते बालक ठीक झाल्यानंतर किंवा वंचित लाभार्थी यांना *मॉप अप राऊंड दिन दि 08/03/2021* गोळी देणे.

-गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा, अंगणवाडीत थांबवून ठेवावे.


यादिवशी गोळी दिल्यास *aa* अशी खुण करणे.


-गोळी खाल्यानंतर काही दुष्परिणाम दिसल्यास क्षार संजिवनी पाजणे.त्वरीत वैदयकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधणे. 

-ज्यामुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे त्यामुलांना गोळी खाल्या नंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तेंव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही.

No comments:

Post a Comment