K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday 14 November 2018

बालदिन विशेष

बालदिन विशेष



                    बाल दिन हा एक खास बालकांसाठीविशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरुन २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारतात, भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (१४ नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.

बाल दिन म्हणजे काय??


                      पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंती निमित्त दरवर्षी बालदिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लहान मुलं म्हणजे पंडितजींचा जीव की प्राण. मुलं ही देवाघरची फुलं आहेत, असं ते म्हणायचे.
पण भारतातल्या अनेक, किंबहुना प्रत्येक ब्रिजवर ही अशी उमलण्यापूर्वीच कोमेजून गेलेली मुलं दिसतात, तेव्हा प्रत्येक नागरिकाचा जीव कासावीस होतो.


स्वतः दुर्गंधीत राहत असले तरी इतरांना सुगंध मिळावा यासाठीचा हा भाबडा प्रयत्न.

सत्तेच्या, स्वार्थाच्या राजकारणात आपलं कर्तव्य, जबाबदारी विसरलेल्या, मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या प्रशासनाला हा फुलविक्रेता 'गेट वेल सून' अशा सदिच्छा तर देत नसेल?
शेवटी हीसुद्धा मुलंच. कधीतरी एखादी गोष्ट त्यांच्या मनात भरते. आपल्याकडेही ती असावी, असंही त्यांना वाटत असेल. पण, या सगळ्या इच्छा आकांक्षांना मुरड़ घालण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.

सगळ्याचं जीवन प्रकाशमान करणा-या सूर्याला ही मुलं साद घालतायत. आमच्या आयुष्यातला अज्ञानाचा, गरिबीचा अंधार दूर होऊ दे, अशी प्रार्थना ते सूर्यनारायणाला करत आहेत. शाळेत जाण्याची संधी मिळाली, तसाच पुढचा मार्गही सोपा होऊ दे, हीच त्यांची इच्छा असणार!


गेले ते ‘बाल’ दिन!

बालदिन विशेष लेख -


                   शाळेत शिकत असताना इंग्रजी, मराठी, हिंदी अशा तीन-तीन भाषांचा अभ्यास आम्ही करत असू. अर्धशतक उलटून गेले तरी या तीन भाषांनी विद्यार्थ्यांची पाठ आजही सोडलेली नाही ही चांगली गोष्ट आहे. निबंध लेखनात यापैकी निदान कोठल्या तरी एका भाषेचे शिक्षक ‘मी कोण होणार?’ हा किंवा यासारखा एखादा विषय हमखास देणार हे ठरलेले असायचे. मग विद्यार्थीही आपापल्या कल्पनेनुसार आणि वकुबानुसार स्वत:च्या भवितव्याचे चित्र त्या निबंधात रेखाटत. अर्थात ही ध्येयाकांक्षा आणि वास्तव यात कोणाचा फारसा ताळमेळ जमत असे असे नाही. सातवी-आठवीच्या आणि यात स्वत:च्या पंचविशीचे भविष्य आपणच वर्तविणे ही कठीणच गोष्ट होती. (याचे भान हा विषय देणाऱ्या त्यांच्या शिक्षकांनाही नव्हते ती गोष्ट अलाहिदा!) आमच्या सुदैवाने त्या वेळच्या आमच्या शिक्षकांना हे भान होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या आम्हा विद्यार्थ्यांना त्यांनी एक सुरेख कानमंत्र दिला होता. ‘‘चांगला अभ्यास करीत राहा आणि तुम्हाला ज्या लहान-मोठय़ा सुटय़ा मिळतील त्यांचा उपयोग तुम्हाला आनंद मिळेल, अशा गोष्टीत करा.’’ त्यांचा हा मोलाचा संदेश आमच्या समकालीन पिढय़ांनी तंतोतंत मानला आणि या बाबतीत त्यांच्या मार्गदर्शनाचा भरपूर फायदा करून घेतला.

दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याची उन्हाळी सुटी या त्या काळात दीर्घकालीन सुटय़ा असत. सर्व जण या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असत. रांगोळ्या काढणे, आकाशकंदील बनविणे, फटाके आणून उन्हात वाळविणे हे सार्वत्रिक कार्यक्रम ठरलेले. मातीचे किल्ले बनविणे हा दिवाळीच्या सुटीतला एक आवडीचा उपक्रम असे. दोन बुरुज, त्याच्या मधोमध प्रवेशद्वार आणि थोडाफार डोंगरसदृश आकार हा सर्वसाधारणपणे किल्ल्याचा ठरलेला देखावा. मग त्याच्या अवतीभोवतीचा परिसर प्रत्येक जण आपापल्या मगदुराप्रमाणे उभारीत असत. पाठीवर ढाल बांधलेला व हातात उंचावलेली तलवार असणारा एखाददुसरा मातीचा किंवा मेणाचा बनविलेला मावळा, बुरुजावर एखाददुसरी पुठ्ठय़ाची बनविलेली किंवा विकत आणलेली पत्र्याची तोफ अशा प्रकारे तो किल्ला सजविला जाई. रांगोळ्या आणि निसर्गाच्या एखाद्या देखाव्याचे चित्र अंगण सारवून त्यावर काढला जाई. दिवेलागणीची वेळ होताच त्या त्या परिसरातले सवंगडी एकत्र जमून आपापल्या किल्ल्यांची रोज डागडुजी करीत. त्या काळात नगरपालिकाही या जल्लोषांत अधूनमधून सामील होत असे. मला चांगले आठवते की, ठाणे नगरपालिकेने १९८० मध्ये किल्ले करण्याची एक स्पर्धा आयोजित केली होती. शहरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला होता. त्या वेळी काही विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या किल्ल्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन, त्या त्या ठिकाणांची रेखाटने करून, बुरुजांचे आकार व संख्या मोजून आपापली मॉडेल्स साकारली होती. हे सर्व किल्ले इतके हुबेहूब साकारले होते की, त्या वेळच्या परीक्षकांनी सगळ्यांचे तोंड भरून कौतुक केले होते. पालिकेनेही या उपक्रमासाठी हजारो रुपयांची पारितोषिके विद्यार्थ्यांना दिली होती.

दीर्घकालीन सुटय़ांमध्ये आणखीही अनेक उपक्रम हाती घेतले जात. त्यात एखाद्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली जवळपासच्या ऐतिहासिक किंवा मामाच्या गावी अथवा अन्य प्रसिद्ध ठिकाणी (उदा. कर्नाळा अभयारण्य) सायकलींवरून प्रवास करून जाण्याची योजना असे. एखादी भारतीय किंवा परदेशी भाषा शिकणे असाही एखादा उपक्रम दीर्घकालीन सुटीत पार पाडण्याचा शिरस्ता त्या काळात होता. फोटोग्राफीसारखी एखादी उपयुक्त कला आपापल्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे प्रयोगही त्या काळी होत असत. यासाठी ‘क्लासेस’ची सोय तेव्हा नव्हती. मग कोणी तरी वसंतराव लिमयांसारखा फोटोग्राफीमध्ये वाकबगार असलेला एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना विनामूल्य ही कला शिकवीत. मी स्वत: त्यांच्याकडून फिल्म धुण्यापासून फोटो प्रिंट काढण्यापर्यंत सर्व प्रक्रिया शिकलो होतो. इतर अनेक जण त्यांच्याकडे शिकून गेल्याचे माझ्या चांगले स्मरणात आहे.

विहिरी किंवा तलावात पोहायला शिकणे हा एक आवडता उपक्रम त्या काळात पार पडे. ठाण्यातील एक जुन्याजाणत्या पिढीतले मेजर गावंड यांच्या भल्यामोठय़ा विहिरीत पोहायला शिकण्याची मजा काही और असे. आर्य क्रीडामंडळातील एक पत्की नावाचे तरुण स्वयंसेवक आम्हा मुलांना गोळा करून त्या विहिरीवर नेत व बेधडक सगळ्यांना एकदम विहिरीत उडय़ा मारायला सांगत. त्यांच्याबरोबर त्यांचे इतर साथीदारही मदतीला असत.

मे महिना उजाडला की, अनेक पालकांची व विद्यार्थ्यांची काही ठरावीक कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्याची धडपड हमखास सुरू होणार हे ठरलेले. वसंतराव लिमये, सदूभाऊ भावे यांच्याकडे गणिताच्या क्लासला प्रवेश मिळाला म्हणजे विद्यार्थ्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटे, अशी ही त्या विषयातली ‘दादा’ मंडळी होती. लीलाताई जोशींच्या क्लासला इंग्रजीसाठी प्रवेश मिळावा म्हणून पालकांची झुंबड उडे. पुढच्या काळात आणखी एका नामवंत शिक्षकाची भर पडली ती विलास जोशी यांच्या इंग्रजी माध्यमातल्या गणित व सायन्सच्या क्लासची. ते वार्षिक परीक्षेत गणित व विज्ञानात मिळवलेल्या गुणांनुसार अगदी काटेकोरपणे प्रवेश देत असत. जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी पुस्तके व वह्य़ाखरेदी हा आणखी एक ठरलेला संकल्प. काही जण आपापल्या सीनिअर मित्रमैत्रिणींकडून त्यांनी वापरलेली पुस्तके स्वत:साठी मिळविण्याच्या खटपटीत असत. मग पुस्तकांना कव्हरे घालणे, हा ठरलेला एक कार्यक्रम असे. याच्या जोडीला अलीकडच्या काळात आणखी एका कामाची भर पडलेली दिसते. ती म्हणजे शाळेचा युनिफॉर्म घेणे. एकूणच जून महिना हा पालकांच्या दृष्टीने खरेदीचा महिना असे.

अलीकडच्या काळात शालेय जगतातील विद्यार्थ्यांचे हे मानचित्र आता पुष्कळ अंशी बदलू पाहत आहे. पालकही बदलताहेत. ते आपल्या मुलामुलींचे हट्ट पुरविण्याच्या मूडमध्ये दिसतात. ‘नवी पुस्तके व नवीन चपला-बूट- नवे दप्तर असा सर्व नव्याचा जमाना येऊ पाहतोय. स्वत:ची भावी करिअर स्वत: ठरविण्याच्या पाल्यांच्या कलापुढे पालकांना कित्येकदा नमते घ्यावे लागते. कोणाच्या क्लासला जाणार याचा पाल्याने घेतलेला निर्णय मुकाटय़ाने स्वीकारण्याच्या मन:स्थितीत पालक असतात. संगणकाच्या आधाराने सर्व शिक्षण हे जरी येणाऱ्या काळात अटळ असले तरी त्यांचे सर्व जीवनच संगणक व्यापू पाहत आहे. अनेक विद्यार्थी संगणकाच्या जोडीला संगणक प्रणालीत येणारी इतर आयुधे () निष्कारण सर्रास वापरताना दिसू लागली आहेत. त्यांचे हे आक्रमण चिंताजनक वाटते. माणसाची निसर्गदत्त सर्जनशीलता आम्ही अशीच विनावापर कुजवली तर त्याचा भविष्यकाळ काय असेल? आमच्या पूर्वजांना शेपूट होते, ते विनावापरामुळे आज गायब झाले आहे. येथवर ठीक! पण मानवी मेंदू, त्याच्या हातापायांची चलनवलन शक्ती अशा मूलभूत गोष्टीच जर विनावापरामुळे अदृश झाल्या तर!

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
बाल दिवस 2018 महत्व पर लेख हिंदी मे -

                       बच्चे ही किसी देश का भविष्य होते हैं ,उनका विकास देश के विकास को मजबूती देता हैं जितना शक्तिशाली देश के बच्चा होता हैं उतना ही उस देश का युवा प्रभावशील बनता  हैं और उतना ही उज्ज्वल उस देश का भविष्य होता हैं इसलिए हमारे देश में प्रति वर्ष बाल दिवस मनाया जाता हैं.यह दिन एक राष्ट्रिय त्यौहार बाल दिवस के रूप में बच्चो को समर्पित किया गया हैं.

बाल दिवस कब मनाया जाता हैं ? ( Children’s Day 2018 Date)
बाल दिवस पंडित जवाहरलाल नेहरु के जन्म दिवस 14 नवंबर के दिन मनाया जाता हैं. जवाहरलाल नेहरु स्वतंत्र भारत के पहले प्रधानमंत्री थे और वे बच्चों को बहुत पसंद करते थे, इसलिए ही बच्चे उन्हें चाचा नेहरु कह कर पुकारते थे.
नेहरु परिवार ने देश की आजादी में भरपूर योगदान दिया और इसी का परिणाम रहा कि उन्हें देश वासियों ने बहुत पसंद किया और वे इस लोकतान्त्रिक देश के प्रथम प्रधानमंत्री बने.
चाचा नेहरु को बच्चों से विशेष प्रेम था. वे अपना समय बच्चो के बीच बिताना बहुत पसंद करते थे और बच्चे भी इनके साथ सहज महसूस करते थे आसानी से इनसे जुड़ जाते थे अपने दिल की बात इनसे कर पाते थे इसलिए बाल दिवस के लिए नेहरु जी के जन्म दिवस से अच्छा कोई मौका नहीं हो सकता था.
बाल दिवस विश्व स्तर पर भी मनाया जाता है, जिसकी दिनांक 20 नवंबर हैं इसकी घोषणा 1 जून 1950 में  Women’s International Democratic Federation द्वारा की गई थी. विभिन्न देशों में भिन्न- भिन्न तारीख पर यह दिन मनाया जाता हैं. भारत देश में यह दिन 14 नवंबर को मनाया जाता हैं.
बाल दिवस इतिहास  (Children’s Day History)
विश्व स्तर पर बाल दिवस मनाये जाने का प्रस्ताव श्री वी कृष्णन मेनन द्वारा दिया गया था, जिसके बाद सबसे पहली बार बाल दिवस अक्टूबर में मनाया गया. सभी देशों में इसे मनाये जाने एवम स्वीकृति मिलने के बाद संयुक्त महा सभा द्वारा 20 नवंबर को अन्तराष्ट्रीय बाल दिवस की घोषणा की गई.
बच्चो के अधिकारों के हनन को रोकने के लिये संयुक्त राष्ट्र संघ द्वारा उनके अधिकारों की भी घोषणा की गई और उसी के आधार पर बाल दिवस मनाये जाने की बात को पुरे विश्व ने स्वीकार किया.
भारत देश में कई बाल श्रमिक हैं, जबकि हमारे देश में 18 वर्ष से कम की आयु के बच्चो को किसी भी तरह का काम करने की इजाजत नहीं है. बाल अधिकारों को सामने रखने के लिए तथा उनके प्रति सभी को जगाने के लिए बाल दिवस का होना जरुरी हैं. इस एक दिन के कारण सरकार एवम अन्य लोगो का ध्यान इस ओरे करना जरुरी हैं. इस एक दिन से इस समस्या का समाधान आसान नहीं हैं लेकिन इस ओर सभी के ध्यान को केन्द्रित करने के लिए इस एक दिन का होना जरुरी हैं.
बच्चे ही देश का भविष्य होते हैं अगर वे पढने लिखने की उम्र में काम करेंगे, आजीविका के लिए खून पसीना एक करेगे, तो देश का भविष्य अंधकारमय हो जायेगा. सामान्य शिक्षा सभी का हक़ हैं और उसे ग्रहण करना आज के बच्चो का कर्तव्य बभी होना चाहिये तब ही देश का विकास संभव हैं.
बाल दिवस एक ऐसा आईना होना चाहिये, जिसके जरिये सभी को बालको के अधिकार का पता चले और इसका हनन करने वालों को इस बात की गहराई का पता चले, कि वे किस प्रकार देश के भविष्य के साथ खिलवाड़ कर रहे हैं. तभी बाल दिवस का होना कारगर सिद्ध होगा.
कैसे मनाया जाता हैं ? (Children’s Day Celebration)
भारत देश में बड़ी धूमधाम से बाल दिवस मनाया जाता हैं. इस दिन पंडित नेहरु को श्रधांजलि दी जाती हैं. बच्चो के चहेते चाचा नेहरु के जीवन के पन्नो को आज के दिन पलटा जाता है, आने वाली पीढ़ी को आजादी के लिए दिये गये इनके योगदान के बारे में बताया जाता हैं.

विभिन्न तरीको से बाल दिवस मनाया जता हैं :
विशेषकर विद्यालयों में बाल दिवस के उपलक्ष्य में आयोजन किये जाते हैं. कई तरह की प्रतियोगिता रखी जाती हैं.
कई तरह के नाटकों का आयोजन किया जाता हैं, नृत्य, गायन एवम भाषण का भी आयोजन किया जाता हैं.
बच्चो के लिए खासतौर पर मनाये जाने वाले इस त्यौहार में बच्चों को उनके अधिकारों, उनके कर्तव्यों के बारे में अवगत कराया जाता हैं.
छोटे-छोटे बच्चों के मनोरंजन के लिये पिकनिक एवम कई खेल कूद का आयोजन किया जाता हैं.
इस दिन रेडियो पर भी कई तरह के कार्यक्रम आयोजित किये जाते हैं जो बच्चो को मार्गदर्शन प्रदान करते हैं.
इस तरह पुरे देश में स्कूल ,सरकारी संस्थाओं एवम कॉलोनी में बाल दिवस का त्यौहार मनाया जाता हैं. बच्चो के उत्साह को बढ़ाने के लिये कई प्रतियोगिता रखी जाती हैं जिससे उनके अंदर के कई गुणों का पता चलता हैं.और इसी से बच्चों का सर्वांगिक विकास होता हैं.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
बाल दिवस पर कविता (Bal Diwas Kavita Poem)

आता हैं हर वर्ष ये पल

झूमे नाचे बच्चे संग-संग

देते चाचा नेहरु को श्रद्धांजलि

थे यह देश के पहले प्रधानमंत्री

करते थे बच्चों से प्यार

हर जयंती पर होता बच्चो का सत्कार

कच्ची मिट्टी हैं बच्चो का आकार

सच्चे साँचे में ढले यही हैं दरकार

ना हो अन्याय से भरा इनका जीवन

प्रतिज्ञा करो न करोगे बाल शोषण

नन्ही सी कलि हैं ये

भारत का खिलता कमल हैं ये

बाल दिवस पर हैं इन्हें सिखाना

जीवन अनमोल हैं यूँही ना गँवाना

देश के भविष्य हो तुम

शक्तिशाली युग की ताकत हो तुम



  •          इस कविता के माध्यम से यही सन्देश देना चाहती हूँ कि बाल दिवस केवल एक त्यौहार नहीं हैं इस दिन बच्चों को उनके अधिकार और कर्तव्य सिखाना हम नागरिकों का फर्ज हैं ताकि देश का भविष्य उज्जवल हो सके. सबसे पहले हमें खुद को बाल दिवस का महत्व समझाना हैं ताकि हम बच्चो का शोषण ना करे और ना होने दे. जब तक देश के बच्चे स्वस्थ एवम शिक्षित नहीं होते तब तक एक अच्छे देश की कल्पना व्यर्थ हैं.


धन्यवाद

No comments:

Post a Comment