K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday 9 June 2021

 आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी दिनांक ११ जून २०२१ पासून ते ३० जून २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा .


पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


         आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठीची सोडत ७ एप्रिलला काढण्यात आली होती. त्यात ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर करोना प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी लागली. आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.


         प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश घ्यावा. बरेच पालक प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश अर्जात घर ते शाळेचे अंतर चुकीचे भरतात. त्यामुळे पालकांनी सादर केलेल्या रहिवासी पत्त्याच्या पुराव्यावरून शाळेने अंतराची पडताळणी करावी. चुकीचे अंतर नमूद केल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये. संबंधित पालकांना तालुकास्तरीय समिती शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यास सांगावे. पडताळणी समितीने आलेले अर्ज, तक्रारींची शहानिशा करून प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेश सुरू होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देऊ नये याबाबतचा आदेश शाळेला द्यावा.


         शाळांनी पालकांना प्रवेशासाठी तारखा द्याव्यात आणि आरटीई प्रवेश सुरू झाल्याची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर लावावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी संपल्यानंतर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील प्राधान्य द्यावे. त्याबाबतच्या सूचना आरटीई संकेतस्थळावर दिल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


🎯 ज्या मुलांची निवड झाली आहे त्यांची प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे, तरी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

खुला प्रवर्ग – 

1) जन्म प्रमाणपत्र 

2) रहिवाशी दाखला / वास्तव्याचा पुरावा

३) आधार कार्ड प्रत (बालकाचे)

४) आधार कार्ड प्रत (पालक)

5) उत्पन्न दाखला 

६) हमीपत्र 

7) ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter ) ची प्रिंट 

8) प्रवेश अर्ज 

9) जात प्रमाणपत्र ( लागू असल्यास )

         इत्यादी कागदपत्रे तयार करून ज्या शाळेमध्ये आपल्या पाल्याचा नंबर लागलेला आहे तिथे जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा ही विनंती.🙏


 स्रोत : 


📌 परिपत्रक पहा 👇 


No comments:

Post a Comment