K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 4 June 2021

 ५ जून - जागतिक पर्यावरण दिन

        दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा  करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

         पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ  या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding or encircle. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. म्हणून इ. स. १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले.

         मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे.



पर्यावरण दिवसाचं महत्त्व

         पर्यावरणामुळेच आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचं जीवन शक्य आहे. पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा या दिवसामागील उद्देश आहे. लोकांमध्ये पर्यावरणाप्रति जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

का साजरा करतात हा दिवस?

         जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे, "आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय - स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे."

         पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात.


घरात राहून पर्यावरण दिवस साजरा कसा करणार?

- शक्य असल्यास यंदा आपल्या घरातच छोटी रोपं लावा.


- वस्तूंचा फेरवापर करण्याबाबत विचार करा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही यात सहभागी करा.


- पॉलिथिनचा वापर शक्यतो करु नका, त्याऐवजी कापडी पिशव्या वापरा.


- विजेचा कमीत कमी वापर करा.


- घरातील कोणतीही वस्तू फेकण्याआधी तिचा आणखी कोणत्या प्रकारे वापर होईल का हे पाहा.


- रस्त्यावर किंवा इतरत्र थुंकू नका आणि इतरांनाही याबाबत सांगा.


- नव्या पिढीला निसर्ग, पर्यावरण, पाणी तसंच वृक्षांचं महत्त्व समजावून सांगा.



पर्यावरण आणि लॉकडाऊन

         कोव्हीड १९ या जागतिक महामारीमुळे जगातील बहुसंख्य देश लॉकडाऊनमध्ये आहेत. लोक घरातच असून कारखाने काहीप्रमाणात बंद आहेत. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत , कच्छपासून कामरूपपर्यंत भारतात एरव्ही श्वास घेण्यासही मुश्किल केलेल्या प्रदूषणाची पातळी भारतात सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे लक्षणीयरीत्या कमी झाली असून ओझोन लेयरमधे सुधारणा दिसत आहे.

         निरभ्र आकाश आणि स्वछंद उडणारे पक्षी, स्वच्छ नद्या हे दृश्य अनेक शहरे आणि महानगरात पाहावयास मिळत आहे. भारतातील गंगा यमुना यांच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा दिसत आहे. भारत आणि नेपाळ मधील हवेची गुणवत्ता सुधारल्यामुळे काठमांडूमधून हिमालय आता स्वच्छ दिसू लागला आहे.

         लॉकडाऊन काळात पर्यावरणावर सकारात्मक बदल घडून आला आहे. इटलीच्या समुद्रात डॉल्फिन दिसला, भारतात मोर, बिबट्या यांचे शहरांमध्ये आगमन होत असून, पशु पक्षांचा किलबिलाट ऐकू येत आहे . पृथ्वीसाठी करोना जणू संजीवनी बनून आला आहे. मात्र लॉकडाऊन नंतर हवेच्या आणि पाण्याच्या प्रदूषणाची वाढ रोखण्यासाठी आणि त्याच्या सकारात्मक परिणामांसाठी दीर्घकाळ उपाय करण्याची गरज आहे. यामुळे निसर्ग ओरबाडणाऱ्या मानवाने याकडे संधी म्हणून बघून योग्य उपाय योजले पाहिजे.




No comments:

Post a Comment