K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 31 May 2021

 जागतिक तंबाखू विरोधी दिन (दि.३१ मे)

परिचय

तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम


परिचय

         31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.

       तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.


तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम

         तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.


राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

         केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

         तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

आपली जबाबदारी


व्यसनाधिनतेचे परिणाम 

आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.


लेखक: अनिल आलुरकर

जिल्हा माहिती अधिकारी, बीड


दिनविशेष

 ३१ मे

-----------------------------------------

जागतिक तंबाखू विरोधी दिन

------------------------------------------


जागतिक तंबाखू विरोधी दिनाची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वतीने ३१ मे १९८७ साली करण्यात आली. ‘तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून होणारे रोग’ या संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


तंबाखू वनस्पती


तंबाखूला निकोटियाना प्रजातीच्या वनस्पतीच्या पानांन पासून बनविण्यात येते. तंबाखूचे पीक जगभरात उपलब्ध असून त्याला उत्तम मागणी आहे.  निकोटीन हा तंबाखूमधील एक प्रमुख घटक असतो.


तंबाखूचा  इतिहास

अमेरिकेमध्ये इसवीसनपूर्व ६००० मध्ये तंबाखूची शेती केल्याचे सर्वात जुने पुरावे सापडतात. तेथील आदिवासींनी धार्मिक आणि औषधी कारणासाठी तंबाखूचा वापर केला होता. १४९२ मध्ये क्रिस्तोफर कोलंबसला अमेरिकेतील स्थानिक आदिवासींनी भेट म्हणून तंबाखूची पानं दिली. कोलंबसमार्फत तंबाखूची युरोपला ओळख झाली. १५५६ मध्ये फ्रान्स, १५५८ मध्ये पोर्तुगाल, १५५९ मध्ये स्पेन आणि १५६५ मध्ये इंग्लंड या देशांमध्ये तंबाखूचे पीक दाखल झाले. पुढे १६५० मध्ये युरोपीय व्यापाऱ्यांनी तंबाखू आफ्रिकेतही नेली आणि तिथे या मोठे उत्पन्न देणाऱ्या या पिकाची लागवड सुरु झाली. १७५३ मध्ये स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञ कॅरोलस लिनिअस यांनी नामांकित केलेल्या तंबाखूच्या प्रजाती – निकोटीयाना रस्टिका आणि निकोटीयाना टॅबॅकम यांना पहिल्यांदाच नाव देण्यात आले. १७९४ मधेय अमेरिकेत पहिल्यांदा तंबाखूवर कर लावण्यात आला. १८२६ मध्ये शास्त्रज्ञांना तंबाखूपासून निकोटीन वेगळे करण्यात प्रथमच यश आले. १९१२ मध्ये प्रथमच धूम्रपान आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा संबंध जोडला गेला. १९९० च्या दशकात अमेरिकेसह अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंधने आली. भारतात तंबाखूचे पीक इसवीसन  १६००च्या सुमारास पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आणले. भारतात त्या आधीही तंबाखूच्या काही स्थानिक जाती होत्या. परकीय व्यापाऱ्यांसाठी भारत हे तंबाखूचे एक प्रमुख उत्पादन केंद्र बनले. ब्रिटीश राजवटीत तंबाखू हे एक प्रमुख नगदी पीक होते.

तंबाखूचे प्राचीन पुरावे

भारतातील प्राचीन साहित्यांमध्ये तंबाखूचे ‘तमाखू’ असे वर्णन करण्यात आले आहे. संस्कृत आणि इतर काही प्रादेशिक भाषेतील साहित्यांमध्ये तंबाखूचे सतराव्या शतकापूर्वीचेही दाखले मिळतात. काही इतिहासकारांच्या मते सतराव्या शतकाच्या सुरवातीस तंबाखूची वनस्पती अमेरिकेतुन भारतात स्थलांतरीत झाली. भारतामध्ये गांज्याचा वापर इसवीसनपूर्व २००० पासून असून, सर्वप्रथम त्याचा उल्लेख अथर्ववेदामध्ये करण्यात आला आहे, प्राचीन काळी तंबाखूचा उपयोग आशीर्वाद आणि आरोग्य या दोन्हीसाठी केला गेला. तसेच, पाहुण्यांचे स्वागत करतानाही तंबाखू भेट म्हणून दिली जात असे. पुरातत्वशास्त्रज्ञांना प्राचीन माया संस्कृतीच्या उत्खननात निकोटीनचे काही अंश सापडले. माया संस्कृतीतील ते अवशेष साधारण हजार वर्षे जुने आहेत. प्राचीन काळातील तंबाखूच्या वापराचा हा पहिला प्रत्यक्ष पुरावा मानला जातो. २०१८ मध्ये उत्तर अमेरिकेतील शास्त्रज्ञांना ३५०० वर्षे जुन्या चुनखडीच्या (लाईमस्टोन) चिलीममध्ये निकोटिनचे अंश सापडले. आईस एज (हिमयुग) साईटच्या उत्खननदरम्यानही उत्तर अमेरिकेत सर्वात जुन्या तंबाखूचा पुरावा सापडला. हा पुरावा तंबाखूच्या बियांचा आहे. या बिया सुमारे १२००० वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत.

तंबाखूचे उत्पादन करणारे देश

तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन चीन मध्ये होते. यानंतर ब्राझील आणि भारताचा क्रमांक येतो. भारतात आंध्रप्रदेश, बिहार, आसाम, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि पश्चिमबंगाल या राज्यांमध्ये तंबाखूचे पीक घेतले जाते. तमिळनाडु, आंध्र प्रदेश, पंजाब, बिहार, म्हैसूर आणि पश्चिम बंगालमध्ये तंबाखू संशोधन केंद्रे आहेत.


तंबाखूमुळे होणारे रोग

निकोटीनमुळे तंबाखूचे सेवन करण्याची सवय लागते. तंबाखूच्या सेवनाने घसा, फुफ्फुस, तसेच मुखाचा कॅन्सर होतो. सिगारेट हे प्रमुख तंबाखूजन्य माध्यम असून, जगभरात साधारण १.१ अब्ज लोक सिगारेट ओढतात असे डब्ल्यूएचओची आकडेवारी सांगते. त्यांपैकी ८० टक्के लोक हे कमी उत्पन्न असलेल्या देशांमधील आहेत. दरवर्षी जगभरात साधारण ८० लाख लोकांचा तंबाखूजन्य पदार्थांमुळे मृत्यू होतो. त्यांपैकी ८ लाख ९० हजार जणांचा मृत्यू धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे (पॅसिव्ह स्मोकिंग) होतो.

तंबाखूचा समावेश असणाऱ्या उत्पादनांमध्ये निकोटिन, कार्बन मोनॉक्साईड आणि टार यांसह सुमारे ५००० विषारी पदार्थ असतात. आरोग्यासाठी अपायकारक असणाऱ्या या घटकांमुळेच तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना कॅन्सर होण्याचा धोका असतो.


शाळा मार्गदर्शिका



No comments:

Post a Comment