K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 7 March 2021

 🙋 8 मार्च : जागतिक महिला दिन (International Women's Day 2021)

 यंदाची थीम, इतिहास आणि खास माहिती


महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण व्हावी आणि महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. दर वर्षी "आंतरराष्ट्रीय महिला दिन" 8 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांच्या चळवळीचे प्रतीक असून हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू देखील महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देणे हा आहे.


      या वर्षा साठीच्या "आंतरराष्ट्रीय महिला दिन" 2021 ची थीम आहे- “Women in leadership: Achieving an equal future in a COVID-19 world” ("महिला नेतृत्व: COVID-19 च्या जगात समान भविष्य साध्य करणे").


"आंतरराष्ट्रीय महिला दिन" थीम -

       या वर्षासाठीच्या "आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे" थीम म्हणजे "महिला नेतृत्त्व: कोविड -19 च्या जगात समान भविष्य". ही थीम COVID-19 साथीच्या काळात आरोग्यसेवा कामगार, इनोव्हेटर इत्यादी म्हणून जगभरातील मुली आणि स्त्रियांचे योगदान अधोरेखित करते. आंतरराष्ट्रीय महिला दिन थीमसह पहिल्यांदा 1996 साली साजरा करण्यात आला. त्यावर्षी संयुक्त राष्ट्राची थीम होती, 'भूतकाळाचा उत्सव, भविष्यासाठी नियोजन'.

हे पण वाचा : जागतिक महिला दिनी 8 मार्च 2021 ते 12 मार्च 2021 या कालावधीत  "महिला दिन सप्ताह " साजरा करणे बाबत शासनाचे परिपत्रक...

"आंतरराष्ट्रीय महिला दिन" कधी सुरू झाला -

       "आंतरराष्ट्रीय महिला दिन" ची सुरुवात 1908 मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील महिला कामगार चळवळीपासून झाली. जेव्हा त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी सुमारे 15,000 महिला रस्त्यावर उतरल्या. चांगल्या वेतनाची आणि मतदानाच्या हक्काची मागणी करुन या महिला कामकाजाचा वेळ कमी करण्यासाठी निदर्शने करीत होत्या. महिलांच्या या निषेधाच्या जवळपास एक वर्षानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पक्षाने पहिला राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली. ज्यानंतर महिला दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याची कल्पना क्लारा झेटकिन या महिलेने दिली.

       क्लारा तेव्हा युरोपियन देश डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे कार्यरत महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग घेत होती. त्यावेळी या परिषदेत सुमारे 100 महिला उपस्थित होत्या, ज्या 17 देशांमधून आल्या होत्या. या सर्व महिलांनी क्लाराचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. क्लारा झेटकिन यांनी सन 1910 मध्ये जागतिक स्तरावर महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता. पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन सन 1911 मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये साजरा करण्यात आला. परंतु 1975 साली याला औपचारिकरित्या मान्यता ‍मिळाली.

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे उद्दीष्ट -

       "आंतरराष्ट्रीय महिला दिन" साजरा करण्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दीष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे. तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक केले पाहिजे. आजही अनेक देशांमध्ये महिलांना समानतेचा अधिकार नाही. महिला शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत मागासलेल्या आहेत. त्याचबरोबर महिलांवरील हिंसाचाराच्या घटनाही पुढे येत आहेत. एवढेच नव्हे तर नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये ज्या बाबींचा सामना करावा लागतो तेथे महिलांच्या नोकरीच्या बाबतीतही मागासलेल्या आहेत. जेव्हा 19 व्या शतकात महिला दिन सुरू झाला तेव्हा महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.

हे पण वाचा : महिला शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन....

देश आणि जगात अशा प्रकारे साजरा केला जातो महिला दिन -

       "आंतरराष्ट्रीय महिला दिन" जगभरात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. हा दिवस आता समाजात, राजकारणात आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात महिलांच्या प्रगतीचा दिवस म्हणून आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी भारतात महिलांवर आधारित वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लोक स्त्रियांना शुभेच्छा आणि विविध भेटवस्तू देतात. तसेच, या निमित्ताने नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतात. महिला व बालविकास मंत्रालयाने हा पुरस्कार प्रदान केला आहे. व्यक्ती, गट, स्वयंसेवी संस्था किंवा संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. महिला सशक्तीकरण क्षेत्रात केलेल्या विलक्षण कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

       त्याचबरोबर रशिया, चीन, कंबोडिया, नेपाळ आणि जॉर्जियासारख्या अनेक देशांमध्ये या दिवशी सुट्टी असते. चीनमधील बर्‍याच महिलांना "आंतरराष्ट्रीय महिला दिन" वर कामातून अर्धा दिवस सुटी दिली जाते. याव्यतिरिक्त, इटलीची राजधानी रोममध्ये या दिवशी महिलांना मिमोसा (चिमीमुई) ची फुले देण्याची प्रथा आहे. काही देशांमध्ये, मुले या दिवशी आपल्या आईला भेटवस्तू देतात. म्हणून अनेक देशांमध्ये या दिवशी पुरुष पत्नी, मित्र, आई आणि बहिणींना भेटवस्तू देखील देतात.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही असतो का?

       तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र, आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही असतो. जागतिक पुरूष दिवस 19 नोव्हेंबर रोजी साजरा करतात. 1990 सालापासून आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायला सुरुवात झाली. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी अजून त्याला अधिकृत मान्यता दिलेली नाही.

       60 हून जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. पुरुषांचं आरोग्य, जेंडर रिलेशन, लैंगिक समानता आणि सकारात्मकतेला चालना देणं, हा यामागचा उद्देश आहे.

जागतिक महिला दिन विशेष 2021 : "महिलांचा सन्मान " -


       आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष सन्मान आणि महत्त्व दिले आहे. संस्कृतामध्ये एक श्लोक आहे.

'यस्य पूज्यंते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता:' म्हणजे जिथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे देवता वास्तव्यास असतात. परंतु सध्याच्या आधुनिक काळात सर्वत्र नारींचा अपमानच होत आहे. तिला एक भोगवस्तू म्हणून बघितले जाते तिचा वापर केला जात आहे. स्त्री ही भोगवस्तू नसून तिला देखील काही भावना आहे हे समजत नाही .

आईचा नेहमी आदर केला पाहिजे -

       जननी ही या जगावर सर्वात पवित्र रूप आहे. आई ला भगवंतांपेक्षा देखील उंच मानले आहे. कारण जन्मदात्री ही आई म्हणजे बाईचं आहे. जिच्या पोटी कृष्ण,राम, गणपती, ह्यांनी जन्म घेतले आहे.

सध्याच्या काळात आईला तितकेशे महत्त्व दिले जात नाही.जो बघा तो स्वार्थापोटी तिचे महत्त्व विसरत आहे. नवी पीढीतर आईच्या भावनांना काहीच समजत नाही .पदोपदी तिचा अपमानच करत आहे. सध्याच्या काळात नारीरुपी शक्तीला आईला सन्मान मिळालाच पाहिजे. नव्या पिढीला या विषयी आत्मनिरीक्षण केले पाहिजे.

मुली पुढे वाढत आहे -

       सध्याच्या काळात मुली मुलांपेक्षा अधिक प्रगती करत आहे. प्रत्येक क्षेत्रात मुलांना स्पर्धा देऊन पुढे वाढत आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी स्त्री चे संपूर्ण आयुष्य पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून निघतो. आधीचे जीवन वडिलांच्या घरात घर कामात राबते अभ्यास पण करते हा उपक्रम लग्नापर्यंत चालू

असतो. नंतर लग्न झाल्यावर सासरची जबाबदारी पडते.तिच्या साठी वेळच नसतो घरात संयुक्त परिवार असल्यास तिच्या वर सगळ्या कामाची जबाबदारी पडते. या सगळ्यात तिच्या हौस इच्छा आकांक्षा कुठे दाबल्या जातात हे तिलाच कळत नाही. तरी तिला मान सन्मान नाही. परिवारासाठी केलेला हा त्याग त्यांना सन्मानाचा अधिकारी बनवतो.

       मुलांमध्ये देखील संस्कार घालण्याचे काम देखील आई करते. लहान पणा पासून आपण ऐकत आलो आहोत की आई मुलांची प्रथम गुरु असते. आईच्या नकारात्मक आणि सकारात्मक दोन्हीचे प्रभाव मुलांवर पडतात.

       इतिहासात बघावं तर आई पुतळीबाईंनी गांधींजी आणि आई जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. त्यांना संस्काराची शिदोरी दिली . ह्याचा परिणाम की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वामुळे ओळखतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व विशाल आणि अद्वितीय आहे. चांगल्या संस्काराचे घडण मुलं आई कडूनच शिकतात. चांगले संस्कार देऊन त्याला समाजात चांगलं बनविण्यासाठी महिला आदरणीय आहे.

       सध्या व्यभिचार होण्याच्या बातम्या ऐकू येतात महिलेचा विनयभंग केला. असं ऐकण्यात येत आहे.आजकाल दररोज महिलांबरोबर व्यभिचाराच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये वाचत आहोत. हे नैतिक क्षय आहे माणूस कोणत्या पातळीवर खाली गेला आहे दररोज महिलांचा विनय भंग करून त्यांची छेड काढून त्यांच्या विषयी घाणेरडे उद्गार काढून दाखवतात.
या मागील कारणे काय असू शकतात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दिवसेंदिवस वाढणारी अश्लीलता. ज्याचा आजच्या तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे. दिल्ली मधील झालेल्या सामूहिक बलात्काराने जगाला हादरून टाकले होते. स्त्रीच्या सन्मानाचे रक्षण करण्यावर काही तरी केले पाहिजे आणि याचा विचार करायला पाहिजे.
        काही लोक म्हणतात की या सर्व गोष्टीनां कारणीभूत स्त्रियांचे आधुनिक पोशाख आहे या मुळे असे गुन्हे वाढत आहे. कपड्यांमुळे गुन्हेगारी होते असे म्हणू शकत नाही. आजच्या काळात लहान मुलींवर देखील लैंगिक अत्याचार केले जाते.
इतिहासात बघावं तर देवी अहिल्याबाई होळकर, मदर टेरेसा, इला भट्ट, महादेवी वर्मा, राजकुमारी अमृत कौर, अरुणा आसफअली, सुचेता कृपलानी आणि कस्तूरबा गांधी इत्यादी काही प्रसिद्ध महिलांनी जगभर आपले नाव आणि प्रसिद्धी मिळविली आहे. तर कस्तुरबा गांधी यांनी गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून देशाला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
प्रियदर्शिनी इंदिरागांधी यांनी आपल्या दृढनिश्चयाच्या बळावर भारत आणि जागतिक राजकारणावर आपला प्रभाव पाडला आहे. त्यांना लोह महिला असेच म्हणत नाही त्यांनी पती,पिता आणि मुलाच्या निधनानंतर देखील खचून न जाता धैर्य न गमावता        खडकासारखी कामाच्या क्षेत्रात काम करत होत्या. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन त्यांना चतुर महिला म्हणून संबोधित करायचे कारण त्या राजकारणात आणि भाषणात देखील पटाईत होत्या.
       शेवटी हेच सांगत आहोत की आपल्याला प्रत्येक स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे.त्यांना दुर्लक्षित करणे त्यांची हत्या करणे आणि स्त्रियांचे महत्त्व न समजून घेतल्यामुळे स्त्रियांची संख्या पुरुषांच्या अर्ध्यावर देखील नाही. माणसाने हे विसरू नये की त्याला जन्म देणारी , त्याला या जगात आणणारी देखील एक बाईचं आहे एक स्त्रीच आहे. भारतीय संस्कृतीत तर आपण देवीची पूजा करतो तिला लक्ष्मी, पार्वती, दुर्गा म्हणून मान देतो आणि घराच्या गृहलक्ष्मीला आदर मान देखील
देत नाही. असं करू नये. स्त्रियांचा नेहमी आदर मान सन्मान करावा. स्त्री आहे तर सर्व जग आहे.अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा.

स्रोत : इंटरनेट

No comments:

Post a Comment