K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 10 May 2021

वीरता आणि युद्ध कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराणा प्रताप यांचे अनमोल विचार.

         महान योद्धा महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांना देशातील पहिला स्वातंत्र्य सैनिक मानलं जातं. वीरता आणि युद्ध कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराणा प्रताप यांची ९ मे जयंती असते. महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी  कुंभलगड येथे झाला.(तिथीप्रमाणे १३ जून ला जयंती येते.) महाराणा प्रतापसिंह यांचे वडील महाराणा उदयसिंह असून त्यांच्या आईचे नाव महाराणी जयवंताबाई असे होते. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते.

एक महान योद्धा आणि शौर्य तसेच साहसाचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे महाराणा प्रताप यांची जयंती. एक अत्यंत पराक्रमी राजा अशी त्यांची ओळख.


         असे म्हटले जाते की महाराणा प्रताप यांच्या शौर्याची आग्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत असे. म्हणूनच अबरच्या स्वप्नामध्ये ते  नेहमी येत असत. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक थोर विचारांची जाणीव जनतेला करून दिले. आजही त्यांच्या शूर विचारांची माहिती वाचणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.

 

महान योद्धा महाराणा प्रताप यांचे काही अनमोल विचार...


- मातृभूमी आणि आपल्या आईमध्ये तुलना करणं आणि फरक करणं हे दुर्बल आणि मूर्खांचे कार्य आहे.


- वेळ अत्यंत बलवान आहे. वेळ एक अशी गोष्ट आहे जी राजाला देखील परावृत्त करू शकेल. 


- चांगले कर्म करण्याऱ्यांच्या वाट्याला आलेले दुःख फार कमी कालावधीसाठी असतात. 


- पराभवामुळे पैसे दूर जातील पण तुमचा गौरव मात्र वाढेल. 


- जो कठीण समयी माघार घेतो, तो कोणतीच लढाई जिंकू शकत नाही. 


- जर ध्येय बरोबर असेल तर माणूस काधिच हार मानत नाही. 


- जो व्यक्ती आपल्या कुटुंबाशिवाय इतरांचा देखील विचार करतो तोच खरा नागरिक. 


- सुखी जीवन जगण्यापेक्षा राष्ट्रासाठी कष्ट करणं जास्त चांगलं आहे. 



No comments:

Post a Comment