K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 8 May 2021

 डाळींब खाण्याचे फायदे

            महाराष्ट्रात डाळींब मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पूर्वी भारतात अफगाणिस्तानातून डाळींब येत असत. पण आता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात विशेषत: महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या सोलापूर, नगर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात डाळिंबाची लागवड मोठया प्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डाळींब हे फळ मुबलक प्रमाणात सहजपणे उपलब्ध होऊ शकते. ते आरोग्यासाठी फार उपयुक्त फळ मानले जाते. कारण त्याच्यामध्ये कर्करोग प्रतिबंधक द्रव्ये असून ते फायटो केमिकल्स्ने युक्त असते.

अधूनमधून डाळींब खाण्याचे फायदे म्हणजे हृदय मजबूत होते. त्यातील पॉलिथेनॉल्स् आणि टॅमिन या बाबतीत उपयुक्त ठरतात. या दोन द्रव्यांमुळे रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो. कर्करोगाच्या बाबतीत सुद्धा डाळींब गुणकारी आहे. शरीरामध्ये कर्करोगांच्या पेशींची होणारी वाढ डाळिंबामुळे रोखली जाते. काही कर्करोगांच्या पेशी डाळिंबामुळे मरतात सुद्धा असा काही लोकांचा दावा आहे. अर्थात तो अजून सिद्ध झालेला नाही.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा डाळिंबाचा उपयोग होतो, कारण डाळिंबात भरपूर फायबर्स आणि व्हिटॅमिन्स असतात. डाळिंबाच्या नित्य सेवनाने त्वचा तुकतुकीत होते आणि निरोगी राहते, शिवाय त्वचेवरच्या सुरकुत्या त्यामुळे कमी होतात. डाळिंबाच्या सेवनाने दातांच्या किडीला सुद्धा प्रतिबंध केला जातो. डाळिंबाचा रस पिल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात.

डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात.


उपयोग

– डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात.

– डाळींबाचे शरीरातीत रोगप्रतिकारक शक्ती वाढते,एवढंच नाही तर हिरड्या मजबूत करून दातांची दुर्घधी घालवण्यासही मदत होते.

– ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.

– डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.

– डाळिंब खाल्याने भूक लागण्याचे प्रमाण वाढते.वजन कमी करण्यासही डाळिंब ज्युस महत्वाचा ठरतो.

– त्वचा निरोगी राखण्यासाठी डाळिंब महत्वाची भूमिका बजावते.

– अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

– जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.

– डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

पण डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खाणे आवश्यक आहे कारण दाणे उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते.



स्रोत : फेसबुक

No comments:

Post a Comment