K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 12 April 2021

 दहावी, बारावीच्या परीक्षा अखेर लांबणीवर; विद्यार्थी-पालकांना दिलासा

बारावीची परीक्षा मे अखेरीस, दहावीची परीक्षा जूनमध्ये...


       करोना संक्रमणाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अखेरीस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा मे अखेर तर दहावी परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची यासंदर्भात महत्त्वाची बैठक आज पार पडली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

हे पण पहा :👇

📝 इ.१०वी व १२वी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच

       महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्याची तयारी सुरू होती. मात्र, गेल्या दहा दिवसांत करोनाचा राज्यात उद्रेक झाला. करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमालीची वाढली असून, यात पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी असे परीक्षा प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

       यासंदर्भातली माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

काय म्हणाल्या शिक्षणमंत्री?

       मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दहावी आणि बारावी हा जीवनातला महत्त्वाचा टप्पा आहे. आधीच अभ्यासाचा तणाव आणि त्यातच करोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. अशा परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची, हा मोठा प्रश्न होता. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शालेय शिक्षण विभागाची बैठक झाली आणि त्यात काही महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. म्हणून दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दहावीची परीक्षा जून महिन्यात होईल तर बारावीची परीक्षा ही मे अखेर होईल, जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.


अन्य बोर्डांनाही आवाहन करणार

       राज्य सरकारने बोर्ड परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच पद्धतीने सीबीएसई आणि आयसीएसई या अन्य बोर्डांनीदेखील परीक्षा लांबणीवर टाकाव्यात असे आवाहन या बोर्डांना केले जाणार आहे, अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली.

एप्रिल अखेर सुरू होणार होत्या परीक्षा...

       यापूर्वीच्या नियोजित वेळेनुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल पासून तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार होती. या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. म्हणूनच वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना कसे पाठवायचे हा मोठा प्रश्न पालकांपुढे होता. त्यातच येत्या आठवड्यात महाराष्ट्रात काही दिवसांचा लॉकडाऊनही पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षांवर अनिश्चिततेचे सावट होते. पण आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी-पालकांची जीव भांड्यात पडला आहे.


स्रोत : म. टा.

No comments:

Post a Comment