K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 8 May 2021

 टरबूज.... कलिंगड...🍉


  ह्रुदयाच्या अशक्ततेमूळे सूज येते , तेव्हा कलिंगडाचा रस, किंचित मध, सकाळी अनशापोटी व संध्याकाळी घ्या याने युरिनचे प्रमाण वाढून सूज कमी होते.मळमळ, अरुचि छातित जळजळ, उलटि, अशा वेळी टरबूजाचा रस, खडिसाखर, व लिंबू रस हे मिश्रण जेवणाआधी घ्या..

    ##रक्तदाबनियमित. करते..लठ्ठ लोकांमध्ये रक्तदाब कमी करण्यासाठी टरबूजाचा रस महत्वाची भूमिका बजावत असतो.याव्यतिरिक्त पोटॅशियम व मॅग्नेशियम चे प्रमाण रक्तदाब कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.

      आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी विटामिन .ए.. युक्त आहार घ्यावा. त्याकरिता दररोज टरबुज खाल्ले पाहिजे. टरबूज बीटा कॅरोटीन सम्रुद्ध असल्याने रातांधळेपणा येत नाही. टरबूज खाल्ल्यास मोतिबिंदू होत नाही.. टरबूज मध्ये.,, लिपोसिन,, नावाचा एक पदार्थ आहे. जो आपल्या स्नायू, हाडे 

 .. ह्रुदय व रक्तवाहिन्या संबंधित आरोग्यासाठी मौल्यवान आहे.... टरबूज नियमित खाल्ल्यास निद्रानाश दूर होतो. टरबुज खाऊन आपण आपले वजन कमी करू शकतो.


              . उन्हाळ्यात शरिरातील पाणी कमी होते. टरबूजात पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. टरबूजामूळे तुमचि त्वचा अधिक चांगलि राहते. तजेलदार, व नरम होते.

   टरबूजात लाईकोपीन असतं , जे कॅन्सर च्या कोशिकांचा नाश करण्यासाठी मदत करतं., टरबूजासोबत काळं मीठ, व काळी मिरी पावडर खाल्ल्यास, अपचन दूर होते.. ज्यांना किडनी स्टोन आहे

. त्यांनी कलिंगड जरूर खावे. यात पाणी भरपूर असल्याने युरिन साफ होते. व खडे बाहेर पडतात.

कलिंगड हे मुळात शीतल, थंड असल्याने  केवळ पोटच नाही तर  डोकेहि थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे. याच्या बिया वाटून डोक्यावर लावल्या तर डोकेदुखी बरि होते.. मधुमेह रुग्णांना देखिल हे

 वरदान आहे. कारण यात शर्करा कमी प्रमाणात आहे.. टरबूज सेवनाने कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रणात राहतं. टरबुजाचि साल जाळुन हि राख फोडांवर लावल्यास बरे होतात. तसेच तोंडाचे व्रणहि बरे होतात.

              टरबुजाचे पाणी पिल्यास  सांधेदुखी बरि होते.टरबूजामध्ये अॅंटि- एजिंग गुणधर्म आहेत,

 टरबूजाचा रस पिल्यास अकालि व्रुद्धत्व येत नाही....


 तेव्हा.. निदान उन्हाळ्यात हे फळं दररोज खाऊन, आपला उन्हाळा सुसह्य करु या...



No comments:

Post a Comment